(Source: ECI / CVoter)
G20 Summit : भारत-अमेरिकेतील संबंध महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वावर आधारित : जो बायडन
Joe Biden on G20 Summit : राष्ट्रपती जो बायडन आणि G-20 च्या इतर नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली.
Joe Biden on G20 Summit : भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जी-20 परिषदेचा (G20 Summit) रविवार (10 सप्टेंबर) रोजी समारोप करण्यात आला. या परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात आले होते. त्यांनी रविवारी भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीची प्रशंसा केली आणि सांगितले की, भारत-अमेरिकेतील संबंध हे महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या (ट्रस्टीशिप) तत्वावर आधारित आहे. यावेळी राष्ट्रपती जो बायडन आणि G-20 च्या इतर नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली.
जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार
जो बायडन यांनी 'X' वर पोस्ट केले, "भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीचे मूळ महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात आहे. विश्वस्तत्व (ट्रस्टीशिप) जी आपल्या देशांमधील सामायिक आहे. आम्हाला इथली भेट घडवून दिल्याबद्दल धन्यवाद, पंतप्रधान."
The partnership between India and the United States is rooted in Mahatma Gandhi’s principal of trusteeship – trusteeship that is shared between our countries and for our shared planet.
— President Biden (@POTUS) September 10, 2023
Thank you, Prime Minister for bringing us here today. pic.twitter.com/ulo0T0jgLK
ट्रस्टीशिप म्हणजे काय?
ट्रस्टीशिप हे एक सामाजिक-आर्थिक तत्वज्ञान आहे जे महात्मा गांधींनी मांडले होते. हे श्रीमंत लोकांना एक माध्यम प्रदान करते ज्याद्वारे ते गरीब आणि असहाय लोकांना मदत करू शकतात. हे तत्त्व गांधीजींच्या आध्यात्मिक विकासाचे प्रतिबिंब आहे. सध्या व्हिएतनामच्या भेटीसाठी हनोईमध्ये असलेल्या जो बायडन यांनी महात्मा गांधींना त्यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहताना स्वत:चा आणि G20 नेत्यांचा फोटोही पोस्ट केला.
अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी राजघाटावर G20 नेत्यांचे स्वागत केले.
राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडन आणि G20 नेत्यांचे 'अंगवस्त्रम' ने स्वागत केले. यावेळी पार्श्वभूमीत गुजरातच्या साबरमती आश्रमाचे चित्र दिसत होते. 1917 ते 1930 पर्यंत आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या मुख्य केंद्रांपैकी एक होते.
पंतप्रधान मोदी नेत्यांना आश्रमाचे महत्त्व सांगताना दिसले. त्यानंतर G20 नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
जो बायडन आणखी काय म्हणाले?
जो बायडन यांनी 19 सेकंदाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यांनी दुसर्या पोस्टमध्ये लिहिले की, “आज राजघाटावर जाऊन माझ्या सहकारी G20 नेत्यांबरोबर पुष्पहार अर्पण करणे ही सन्मानाची गोष्ट होती. "महात्मा गांधींचा अहिंसा, आदर आणि सत्याचा संदेश आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे - तो जगाला प्रेरणा देत राहो."
महत्त्वाच्या बातम्या :