एक्स्प्लोर

CBSE, ICSE कडून जाहीर निकषांना सर्वोच्च न्यायालयाकडून संमती, मूल्यांकनाबाबत असमाधानी विद्यार्थ्यांची ऑगस्ट-सप्टेंबर परीक्षा

अंतर्गत मूल्यांकनाच्या निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असेल. ही परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

नवी दिल्ली : CBSE, ICSE परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. 12 वी सीबीएसई, आयसीएसई परीक्षांबाबत जे निकष जाहीर केले आहेत, त्याला सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

यावर्षी कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता सीबीएसईने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या वतीने, कोर्टात सांगण्यात आलं आहे की, सरासरी 3 वर्षांच्या आधारे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाईल. निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असेल. ही परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना या धोरणाबाबत सूचना देण्यास सांगितले होते. बहुतेक याचिकाकर्ते या धोरणाशी सहमत होते, परंतु याचिकाकर्त्यांपैकी एकाने असा दावा केला की जेव्हा CLAT आणि NEET सारख्या परीक्षा ऑफलाईन घेतल्या जात आहेत, तर बारावी परीक्षादेखील घ्याव्यात. ही मागणी फेटाळून लावत कोर्टाने सांगितले की बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. NEET किंवा CLAT ही स्पर्धा परीक्षा आहेत. 

ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी पालक संघटनेच्या वतीने बोलताना मत मांडले की, अंतर्गत मूल्यांकनचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर केला जाईल. परंतु लेखी परीक्षेचा निकाल ऑक्टोबरपर्यंत येईल. यामुळे महाविद्यालयीन प्रवेशात अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे एकतर लेखी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात यावी किंवा दोन्ही निकाल एकाच वेळी जाहीर केले जावे. जुलै महिन्यात लेखी परीक्षा घेण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. पण दोन्ही निकाल एकत्र जाहीर करण्याच्या मागणीवरून अॅटर्नी जनरल यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.

केंद्राच्या वतीने बोलताना अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल म्हणाले की, अंतर्गत मुल्यांकन निकालाची पहिली घोषणा विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. यामुळे त्यांना आणखी एक पर्याय मिळेल ज्याद्वारे ते निकाल सुधारण्यासाठी लेखी परीक्षा देऊ शकतील. वेणुगोपाल म्हणाले की, यूजीसी सर्व महाविद्यालयांना ऑफलाईन परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच प्रवेश सुरू करण्याचे निर्देश देईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Embed widget