एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य : सोनिया गांधी
''देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता. त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता,'' अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला. त्या लोकसभेत बोलत होत्या.
![देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य : सोनिया गांधी Sonia Gandhi Attacks On Rss Latest Update देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य : सोनिया गांधी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/09180700/sonia-NEW.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : ''देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता. त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता,'' अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला. त्या लोकसभेत बोलत होत्या.
स्वातंत्र चळवळीतील महत्त्वाचा भाग असणाऱ्या 'चले जाव' चळवळीला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त लोकसभेत विशेष सत्राचे आयोजन केलं होतं. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव न घेता टीका केली.
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, पारतंत्र्याच्या काळात अशा अनेक संघटना आणि व्यक्ती होत्या. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी होऊन, योगदान दिलं नाही. अशा संघटनांनी स्वातंत्र्य चळवळीचा विरोधच केला. पण आज तेच स्वातंत्र्याच्या गोष्टी बोलत आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)