एक्स्प्लोर

शशीकला नटराजन 29 जानेवारीला मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार?

चेन्नई: तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी AIADMK पक्षाच्या सरचिटणीस शशीकला नटराजन लवकरच विराजमान होण्याची शक्यता आहे. AIADMKने याबाबत काहीही अधिकृत घोषणा केली नसली तरीही तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात सध्या याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, रेडिफ या वेबसाइटनं असंही वृत्त दिलं आहे की, 'सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीला शशीकला नटराजन या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.' शशीकला नटराजन यांची AIADMK पक्षाच्या सरचिटणीसपदी 29 डिसेंबरला निवड करण्यात आली होती. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल असा जाणकारांनी अंदाज वर्तविला होता. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, अवघ्या महिन्याभरातच त्यांना या पदावरुन पायउतार व्हावं लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी 29 जानेवारीच का? शशिकला यांच्या आवडीची तारीख आणि एक शुभ तिथी असल्यानं हा दिवस निवडला जाण्याची शक्यता. 27 जानेवारीला अमावस्या असून त्यानंतर उत्तरायण सुरु होणार आहे. त्यामुळे 29 जानेवारी ही तारीख निवडण्यात येऊ शकते. जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशीकला कोण? शशीकला नटराजन….जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती…या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही…कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं…तर कुणी…लिव्ह इन कम्पॅनियनही… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची… आजवर पडद्याआड वावरणारी शशीकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे. शशीकला आणि जयललितांची ओळख कशी? 1970 च्या सुमारास शशीकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. शशीकला नटराजन हिचा पती पीआरओ म्हणून काम करत होता. आणि तो ज्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होता, तो जयललितांच्या जवळ होता. एका व्हिडिओ शुटिंगच्या निमित्ताने झालेल्या या पहिल्याच भेटीत शशीकलानं जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच ती जयललितांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती बनली. एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशीकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता तिला आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशीकलानं आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30-35 लोकांची टीम बंगल्यावर तैनात केली. स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस, ड्रायव्हर असे सगळे तिच्या गोटातले….एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती एक जाळं विणल्यासारखंच होतं. जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या 1991 साली….पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक झाली. असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होती शशीकला. शशीकलाच्या कुटुंबातले लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात असल्याचे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी हे तर शशीकलाच्या या गोत्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असाच करायचे. शिवाय 1995 साली शशीकलानं आपला भाचा सुधाकरन जयललिलांना दत्तकपुत्र म्हणून दिला. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची इमेज निगेटीव्ह बनत चालली. बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता-शशीकला या दोघींवर एकत्र आरोप झाले. शशीकलाची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग 100 दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशीकलाचा कळवळा आला, आणि त्यांनी तिला माघारी बोलावलं. आता शेवटच्या श्वासापर्यंत शशीकला त्यांच्यासोबतच राहिली. जयललिता आजारी पडल्यापासूनच सगळ्यांना माहिती होतं की भविष्यात सगळा कारभार शशीकलाकडेच असणार…फक्त ती किंगमेकरची भूमिका पसंत करणार की स्वतःच किंग बनायला सरसावणार इतकाच प्रश्न होता. तूर्तास तरी तिनं पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली आहे. पण पनीरसेल्वम आणि शशीकला यांचे संबंध तितकेसे मधुर नाहीत. शिवाय जो करिष्मा, लोकप्रियता, लोकल टच जयललितांचा होता, तितका शशीकलाचा नाही. त्यामुळे ती किती घट्टपणे पक्षावर आपली कमांड ठेवू शकणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. शशीकला पुष्पा नावाची आणखी एक डीएमके खासदार आहे. तिच्यासोबत नुकतंच भांडण झालेलं आणि तिला हाकलून दिलं होतं. मात्र त्या शशीकलाचा याच्याशी काहीही संबंध नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
BCCI : आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, बीसीसीआयचा मोहसीन नक्वीला इशारा, मागणी मान्य न केल्यास पुढचं पाऊल टाकणार 
मोहसीन नक्वीला आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यावीच लागणार, बीसीसीआयचा कडक मेसेज,आता टाळाटाळ महागात पडणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gold Price : सोन्याचे भाव गगनाला मात्र, लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त साधत नाशिककरांचा खरेदीचा उत्साह
Diwali 2025 : Superfast News : 3 PM : दिवाळी विशेष सुपरफास्ट बातम्या : 21 OCT 2025 : ABP Majha
Mira Road Clash मीरा रोडमध्ये दोन गटात राडा, 25 पेक्षा जास्त रिक्षा फोडल्या; प्रताप सरनाईक घटनास्थळी
Pankaja Munde EXCLUSIVEगोपीनाथ मुंडेंसोबतच्या आठवणी;लहानपणीचे किस्से पंकजा मुंडेंसोबत दिलखुलास संवाद
Lakshmi Pujan 2025: किती वाजेपर्यंत करता येईल लक्ष्मीपूजन?; पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
BCCI : आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, बीसीसीआयचा मोहसीन नक्वीला इशारा, मागणी मान्य न केल्यास पुढचं पाऊल टाकणार 
मोहसीन नक्वीला आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यावीच लागणार, बीसीसीआयचा कडक मेसेज,आता टाळाटाळ महागात पडणार
Pro Kabaddi U Mumba player Death: यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
Nashik Crime: गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना 'खाकी'चा दणका!
Raigad Crime News: फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, घटनेनं रायगड हादरलं
दिवाळीचा बोनस कमी आल्याने कर्मचारी भडकले,  टोलनाक्याचे सगळे गेट उघडले अन् गाड्या सुस्साट सोडल्या, 30 लाखांचा टोल बुडवला
दिवाळीचा बोनस कमी आल्याने कर्मचारी भडकले, टोलनाक्याचे सगळे गेट उघडले अन् गाड्या सुस्साट सोडल्या, 30 लाखांचा टोल बुडवला
Embed widget