एक्स्प्लोर

Pulwama Attack : पुलवामातल्या त्रुटींबद्दल राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष? माजी राज्यपालांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Satya Pal Malik : पुलवामा घटनेचं सगळं खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि त्यातून राजकीय फायदा घ्यायचा हेतू पंतप्रधानांचा होता असा आरोप माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलाय. 

नवी दिल्ली: देशाच्या पंतप्रधानांवर थेट आरोप करणारी माजी राज्यपालांची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. पुलवामा घटनेबद्दल काही गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी द वायरच्या मुलाखतीत केले आहेत. या घटनेवरुन आता विरोधकांनीही वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुलवामाबद्दल चूप राहायला सांगितलं, जम्मू काश्मीरच्या अनेक गोष्टी तर त्यांच्या गावीच नाहीत तसेच भ्रष्टाचाराबद्दल त्यांना काही अगदीच तिटकार आहे असं नाही असे आरोप माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहेत. 

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी द वायर या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही मोठी वक्तव्यं केली आहेत. सगळ्यात मोठा आरोप आहे पुलवामाबद्दलचा.

पुलवामातल्या सुरक्षा त्रुटींकडे राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष?
       
पुलवामावेळी सीरपीएफनं संख्या अधिक असल्यानं जवानांच्या वाहतुकीसाठी विमानाची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली होती. राजनाथ सिंह हे त्यावेळी गृहमंत्री होते. ही मागणी मान्य झाली नाही. घटनेनंतर आपण याबाबत पंतप्रधानांना फोन करुन सुरक्षेतल्या त्रुटींबाबत कळवलं असं माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं म्हणणं आहे. पण पंतप्रधानांनी तूर्तास याबाबत मौन धारण करायला सांगितलं. दोभाल माझे वर्गमित्र होते, त्यांनाही कळवलं. पण त्यांनीही असंच सांगितलं. त्यामुळे मला लक्षात आलं की सगळं खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि त्यातून राजकीय फायदा घ्यायचा हेतू दिसतोय असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केलाय. 

मलिक हे त्यावेळी काश्मीरचे राज्यपाल होते. कलम 370 हटवलं गेलं त्याही वेळी ते काश्मीरचे राज्यपाल होते. पण काश्मीरबद्दलच्या अनेक गोष्टी पंतप्रधानांच्या गावीच नसल्याचा दावा त्यांनी केला. सोबत भ्रष्टाचाराबद्दल मोदींना काही अगदीच तिटकारा नाही असंही आपण खात्रीनं सांगू शकतो असंही मलिक या मुलाखतीत म्हणाले आहेत. 

साहजिकच सत्यपाल मलिक यांच्या या विधानानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. 

देशात सध्या स्थिती आहे की बोलण्याची हिंमत खूप कमी लोक करतायत. त्यात मोदींच्याच कार्यकाळात राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक ही हिंमत का करतायत हाही प्रश्न आहेच. त्यासाठी त्यांची पार्श्वभूमीही बघितली पाहिजे. 

सत्यपाल मलिक हे वेस्टर्न यूपी या साखर पट्यातले, जाट समुदायातून येतात. समाजावादी नेते लोहिया यांच्याकडून प्रेरणा घेत ते राजकारणात आले. पण नंतर अनेक पक्ष त्यांनी बदलले. भारतीय क्रांती दल, लोकदल, मग नंतर काँग्रेस. बोफोर्सच्या वादानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. जनमोर्चा बनवला. जनता दलाच्या तिकीटावर ते निवडून आले. मग 2002 पासून ते भाजपसोबत आहेत. 

2017 ते 2022 या काळात सत्यपाल मलिक हे चार राज्यांचे राज्यपाल होते. बिहार, गोवा, मेघालय आणि काश्मीर. गोव्यातही भाजप सरकारच्याच भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी थेट विधानं केली होती आणि त्यांच्या वादांची मालिका याआधीही पाहायला मिळालीय. 

सत्यपाल मलिक आणि वाद
        
शेतकरी आंदोलनाचं राज्यपाल पदावर असतानाही जाहीर समर्थन, मोदी सरकारवर जाहीर टीका.
     
एका मुलाखतीत शेतकरी आंदोलनाबद्दल मोदी उर्मठ असल्याची टीका केली होती. 500 शेतकऱ्यांचा जीव गेल असं आपण त्यांना सांगितल्यानंतर ते माझ्यासाठी गेले का असं मोदी म्हणाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. 
      
काश्मीरमध्ये राज्यपाल असताना एका डीलबाबत मंजुरीसाठी संघाचे राम माधव यांनी दबाव आणल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्याविरोधात मानहानीची नोटीस दाखल करणार असल्याचंही राम माधव यांनी जाहीर केलं आहे. 

सत्यपाल मलिक हे आता राज्यपाल नाहीत. भाजपमध्ये असूनही मोदींविरोधात बोलणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी नंतर दुसऱ्या पक्षांचा मार्ग स्वीकारला. आता सत्यपाल मलिकही त्याच वाटेवर आहेत का याचीही चर्चा रंगतेय. 

पुलवामाच्या आधी आणि पुलवामानंतर, लोकसभा निवडणूक तोंडावर असताना घडलेल्या या घटनेनं चित्र बदलून टाकलं होतं. आता पुढची लोकसभा निवडणुक जवळ आली असताना सत्यपाल मलिक यांनी याबाबतचे आरोप केले आहेत. त्याला भाजप कसं तोंड देतं आणि या वादातून विरोधकांच्या हाती खरंच काही गवसतं का याची उत्सुकता असेल. 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
Ahmedabad Plane Crash: 'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, ब्लॅक बॉक्स डेटाची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'आम्हाला पैसा नको, अपघाताचं कारण हवं आहे, विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची माहिती द्या' अहमदाबाद भीषण विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
'पुढील संघर्ष सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर कोलकात्यापर्यंत पोहोचून घरात घुसून मारु' पाकिस्तानची भारताला धमकी
Abbas Araghchi: 'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही'; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
'होर्मुझ' सुरु करण्यासाठी इराणने ट्रम्पचा 48 तासांचा अल्टिमेटम फेटाळला; म्हणाले, 'तुम्ही हतबल झाल्याने घाबरुन धमक्या देत आहात आम्ही तुमच्यासाठी नरकाचा दरवाजा उघडू'
Ashok Kharat Crime news: आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
आधी अशोक खरातने सर्वस्व लुटलं, मग इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल झाले, पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का
Bhandara News: भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
भंडाऱ्यात 34 कोटींचा रस्ता, पण कंत्राटदाराने सिमेंट वापरलंच नाही, 'फ्लाय ॲश'चा वापर केल्याचा खळबळजनक आरोप
Embed widget