एक्स्प्लोर

आठवण वीर योद्ध्याची; कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याचा थरकाप उडवणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा

विक्रम बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 20 जून 1999 च्या पहाटे 3.30 वाजता या पॉईंटवर तिरंगा फडकवला होता. पॉईंट 5140 वर ताबा मिळवल्यानंतर टीव्हीवर 'ये दिल मांगे मोर' म्हणत त्यांनी संपूर्ण भारतीयांचं मन जिंकल होतं.

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान कारगिल युद्धाबाबत ज्या अभिमानाने आपण बोलतो, त्या युद्धातील खरे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांची आज 21 वी पुण्यतिथी आहे. 1999 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये शत्रूशी लढताना कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आलं होतं. कॅप्टन बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे झाला होता. त्यांनी 6 डिसेंबर 1997 रोजी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात केली होती. भारतीय सैन्यातील जम्मू आणि काश्मीर 13 व्या बटालियनमधून ते देशसेवा करत होते.

कारगिल युद्धाच्या काळात सर्वात कठीण टोलिंग पर्वत रांग आणि 4875 पॉईंट ताब्यात घेण्यात कॅप्टन बत्रा यांची महत्त्वाची भूमिका होती. कारगिल युद्धातील सर्वात महत्वाच्या लढायांपैकी एक या लढाया होता. कॅप्टन बत्रा यांनी पाकिस्तानी सैन्याला अक्षरश: सळो की पळो केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य त्यांचा 'शेर शाह' असा उल्लेख करतात.

लेफ्टनंट विक्रम बत्रा यांनी हम्प आणि रॉक नाब शिखरांवर ताबा मिळवून शत्रूच्या सैनांवर मोठा आघात केला होता. विक्रम बत्रा यांच्या या पराक्रमासाठी त्यांना पदोन्नती देत कॅप्टन बनवण्यात आलं होतं. पदोन्नतीनंतर विक्रम बत्रा यांनी श्रीनगर-लेह मार्गाजवळचा 5140 पॉईंट शत्रूच्या ताब्यातून मुक्त केला होता. विक्रम बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 20 जून 1999 च्या पहाटे 3.30 वाजता या पॉईंटवर तिरंगा फडकवला होता. पॉईंट 5140 वर ताबा मिळवल्यानंतर टीव्हीवर 'ये दिल मांगे मोर' म्हणत त्यांनी संपूर्ण भारतीयांचं मन जिंकल होतं.

आठवण वीर योद्ध्याची; कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याचा थरकाप उडवणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा

पॉईंट 5140 वर यशस्वीरित्या ताबा मिळवल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर 4875 पॉईंटवर तिरंगा फडकवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट अनुज नैय्यर आणि लेफ्टनंट नवीन यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कामगिरीवर निघाले. 4875 पॉईंट समुद्र सपाटीपासून 17 हजार फुट उंचीवर आहे. लेफ्टनंट अनुज नैय्यर यांच्या मदतीने विक्रम बत्रा यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. मात्र त्याच वेळी लेफ्टनंट नवीन यांच्यावर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरु केला. आपल्या सहकाऱ्यावर हल्ला झालेला पाहून विक्रम बत्रा स्वत: नवीन यांच्या समोर ढाल बनून उभे राहिले. मात्र यावेळी शत्रूची एक गोळी त्यांच्या छातीत लागली. हाच तो 7 जुलै 1999 चा  दिवस होता ज्यावेळी अवघ्या 24 वर्षांचे कॅप्टन विक्रम बत्रा देशासाठी शहीद झाले.

भारतीय सैन्याकडून श्रद्धांजली कॅप्टन विक्रम बत्रा यांना सर्वोच्च सैन्य सन्मान मरणोत्तर परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं आहे. मंगळवारी भारतीय सैन्याने कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याचा व्हिडिओ शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mission 150: 'किमान दीडशे जागा लढवणार', BMC निवडणुकीसाठी BJP चा हिंदुत्वाचा नारा; शिंदे गटाची कोंडी?
Thackeray Alliance: 'राज-उद्धव एकत्र येणार', BMC निवडणुकीसाठी शिवसेना-मनसेच्या जागावाटपाची बोलणी सुरू?
Pandharpur Yatra: विठ्ठल भक्तांसाठी 11 लाख लाडू तयार, प्रसाद कमी पडणार नाही - मंदिर समिती
Threat Letter: नवनीत राणांना हत्येची धमकी; Navneet Rana यांना Hyderabad च्या जावेदकडून धमकी
Latur Rains: रेणापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, 6 गावांचा संपर्क तुटला, पिकांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
Bacchu Kadu : आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
Embed widget