एक्स्प्लोर

Reliance Foundation : पूरग्रस्त पंजाबसाठी रिलायन्सची बहुआयामी मदत; दहा मुद्द्यांचा आराखडा जाहीर

Reliance Foundation : पंजाबमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रिलायन्स परिवार, रिलायन्स फाऊंडेशन, वनतारा, रिलायन्स रिटेल आणि जिओ हे सर्वजण तातडीच्या मदतीसाठी कार्यरत आहेत.

चंदीगढ : पंजाबमध्ये आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने तातडीने दहा मुद्द्यांचा मानवतावादी आराखडा जाहीर केला आहे. राज्य प्रशासन, पंचायत संस्था आणि स्थानिक भागीदारांसोबत मिळून रिलायन्सच्या टीम्स अमृतसर आणि सुलतानपूर लोधीतील सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये मदत पोहोचवत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी म्हणाले, “या कठीण प्रसंगात पंजाबच्या जनतेसोबत आम्ही आहोत. अनेक कुटुंबांचे घर, उपजीविका आणि सुरक्षिततेची भावना हरवली आहे. संपूर्ण रिलायन्स परिवार त्यांच्या सोबत उभा आहे. अन्न, पाणी, निवारा किट्स तसेच माणसांसह जनावरांचीही काळजी घेत आहे. हा दहा मुद्द्यांचा आराखडा आमच्या ‘We Care’ या मूल्यांवर आधारित आहे. पंजाबच्या या संघर्षाच्या काळात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत.”

प्रत्यक्ष मदतकार्य : दहा मुद्द्यांचा आराखडा

पोषण सहाय्य

10,000 सर्वाधिक प्रभावित कुटुंबांसाठी अत्यावश्यक कोरड्या अन्नधान्याचे रेशन किट.

1,000 दुर्बल कुटुंबांसाठी (विशेषतः विधवा महिला आणि वयोवृद्धांचे नेतृत्व असलेली कुटुंबे) प्रत्येकी ₹5,000 किमतीची व्हाउचर सहाय्य योजना.

सामुदायिक स्वयंपाकगृहांना कोरडे रेशन पुरवठा.

पाणथळ भागात सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी पोर्टेबल वॉटर फिल्टरची स्थापना.

निवारा सहाय्य

विस्थापित कुटुंबांसाठी ताडपत्री, चटई, डासजाळी, दोर, बिछाना आदींचा आपत्कालीन निवारा किट.

सार्वजनिक आरोग्य जोखीम व्यवस्थापन (PHRM)

पुरानंतर साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य जागरुकता सत्रे व जलस्रोतांची निर्जंतुकीकरण मोहीम.

प्रत्येक प्रभावित घरासाठी स्वच्छता किटचे वितरण.

जनावरांची मदत (Livestock Support)

पाणथळामुळे जनावरांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्यासाठी तातडीची काळजी.

रिलायन्स फाऊंडेशन आणि वनतारा यांनी प्राणी संवर्धन विभागासोबत मिळून औषधे, लस व उपचारांसाठी जनावरांचे कॅम्प सुरू केले.

जवळपास 5,000 गुरांसाठी 3,000 सायलेज बंडल वितरित.

वनताराच्या 50+ तज्ज्ञांची टीम आधुनिक उपकरणांसह बचाव कार्यात गुंतली आहे. वाचवलेल्या प्राण्यांचे उपचार, मृत जनावरांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक अंत्यसंस्कार व संभाव्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने केली जात आहे.

सततचे समन्वय आणि मदत

रिलायन्स टीम्स जिल्हा प्रशासन, प्राणी संवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायतांसोबत 24 तास काम करत आहेत. अल्पकालीन मदतीसोबत मध्यमकालीन पुनर्वसनाची तयारीही सुरू आहे. जिओ पंजाब टीमने एनडीआरएफसोबत काम करत पूरग्रस्त भागात नेटवर्क पुनर्संचयित केले असून राज्यभर 100% विश्वसनीय कनेक्टिव्हिटी सुनिश्चित केली आहे.

रिलायन्स रिटेल टीम, रिलायन्स फाऊंडेशन आणि स्वयंसेवक यांच्या मदतीने पंचायतांच्या माध्यमातून ओळखलेल्या सर्वाधिक प्रभावित कुटुंबांना 21 आवश्यक वस्तूंचा समावेश असलेले कोरडे रेशन आणि स्वच्छता किट पाठवले जात आहेत.

एकत्रित मदतीची हमी

या आपत्तीच्या क्षणी रिलायन्स पंजाबसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे. सामूहिक कृती, काळजी आणि सहानुभूतीच्या माध्यमातून पंजाबचे जलद, सर्वसमावेशक पुनर्वसन व्हावे आणि राज्य अधिक बळकट व्हावे, यासाठी रिलायन्स कटीबद्ध आहे.

रिलायन्स फाऊंडेशनबद्दल माहिती

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची परोपकारी शाखा रिलायन्स फाऊंडेशन देशातील विकास आव्हानांवर नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय शोधण्याचे काम करते. संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशन ग्रामीण परिवर्तन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, शहरी पुनरुत्थान, कला-संस्कृती व वारसा संवर्धन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत फाऊंडेशनने भारतभरातील 91,500 पेक्षा अधिक खेडी व शहरी भागातील 8.7 कोटींहून अधिक लोकांचे जीवन स्पर्शिले आहे.

अधिक माहितीसाठी : www.reliancefoundation.org

सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी :

X: https://x.com/ril_foundation 

Facebook: https://www.facebook.com/foundationRIL 

LinkedIn: https://in.linkedin.com/company/reliancefoundation 

Instagram: https://www.instagram.com/reliancefoundation/ 

YouTube: https://www.youtube.com/@RelianceFoundationTV 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UPSC Result : भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Commercial CNG Gas Nagpur: अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget