एक्स्प्लोर

'इंटरनेटचा वापर मूलभूत अधिकार आहे', हा गैरसमज : रविशंकर प्रसाद

सरकार भाजपचे असो वा इतर कुणाचे, इंटरनेटच्या वापरावर याआधीही अनेकदा निर्बंध आणण्यात आलेले आहेत. काश्मीरमधील या बंदीचा नियमित आढावा घ्यायला हवा, एवढेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे', असे प्रसाद यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली : राज्यसभेत काल रविशंकर प्रसाद यांनी भाषण केलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामुळे कदाचित तुम्ही ते पाहिलं नसेल. रविशंकर प्रसाद यांच्या त्याच भाषणात त्यांनी एक वक्तव्य केलं. ज्याचा थेट आपल्या इंटरनेटशी संबंध आहे. इंटरनेटद्वारे विचारांचे संप्रेषण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे. मात्र, इंटरनेटचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे असा दावा आतापर्यंत कोणत्याही वकिलाने केलेला नाही. आणि हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकारचा गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचं केंद्रीय दळणवळण, माहिती प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत सांगितलं आहे. हिंसाचार आणि दहशतवाद पसरवण्यासाठी इंटरनेटचा गैरवापर होत आहे. त्यामुळे इंटरनेटचा हक्क महत्वाचा असला तरी देशाची सुरक्षा तितकीच महत्वाची असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क असल्याचा युक्तिवाद कुठल्याही वकिलाने केलेला नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. आपली मतं, कल्पना यांची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून करणे हा उच्चार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचा एक भाग आहे, असे प्रसाद म्हणाले. इंटरनेट जसे महत्त्वाचे आहे, तशीच देशाची सुरक्षाही महत्त्वाची आहे असे सांगत ते म्हणाले की, काश्मीरमध्ये हिंसाचार तसेच अशांतता पसरविण्यासाठी दहशतवादी इंटरनेटचा वापर करीत आले आहेत, हे आपण नाकारू शकतो का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या राज्यघटनेने जसे हक्क दिले आहेत, तद्वत त्यावरील नियमनही अधोरेखित केलेले आहेत. इंटरनेट वापरा, मात्र त्याच्या माध्यमातून कुणी हिंसाचार पसरवून देशाचे ऐक्य, अखंडतेला नख लावता कामा नये, असे प्रसाद म्हणाले. सरकार भाजपचे असो वा इतर कुणाचे, इंटरनेटच्या वापरावर याआधीही अनेकदा निर्बंध आणण्यात आलेले आहेत. काश्मीरमधील या बंदीचा नियमित आढावा घ्यायला हवा, एवढेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे', असे प्रसाद यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्या बंद होणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या मात्र त्या खोट्या असल्याचं देखील रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं. देश संकटात असताना सगळ्यात आधी या कंपन्या मदतीला धावतात असं म्हणत त्यांनी वक्तव्याला दुजोरा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी : कोचिंग क्लासच्या भीषण अग्नीतांडवात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, लखनौमधील थरारक घटना
मोठी बातमी : कोचिंग क्लासच्या भीषण अग्नीतांडवात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, लखनौमधील थरारक घटना
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget