एक्स्प्लोर

सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला : राष्ट्रपती

नवा भारत साकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सरकारने लोकांना सकारात्मक दिशा दिली आहे. सरकारने मूलभूत सुविधांना प्राथमिकता दिली आहे. सोबत सरकारी योजनांना नवी गती सरकारने दिली आहे, असेही राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली असून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींनी संबोधित केले. सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला असून मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी सरकारने प्राथमिकता दिली असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, हे वर्ष देशासाठी अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. यावर्षी महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आपण साजरी करत आहोत. आपला देश  महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी केले. 2014 च्या निवडणुकीआधी देश अनिश्चिततेच्या काळात होता मात्र यानंतर देश विकासाच्या वाटेवर चालला आहे. नवा भारत साकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सरकारने लोकांना सकारात्मक दिशा दिली आहे. सरकारने मूलभूत सुविधांना प्राथमिकता दिली आहे. सोबत सरकारी योजनांना नवी गती सरकारने दिली आहे, असेही राष्ट्रपती कोविंद म्हणाले. सरकारकडून 9  लाख कोटी शौचालयांची निर्मिती झाली आहे. गरिबांपर्यंत योजना पोहोचविण्याचा सरकारचा संकल्प आहे. सरकारकडून 6 कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. आयुष्य योजनेच्या अंतर्गत 50 कोटींहून अधिकांना लाभ झाला आहे. कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचा संकल्प सरकारने केला आहे. जनतेचे आयुष्य प्रकाशमान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जनतेला आरोग्य विमा योजनेचा देखील मोठा लाभ झाला आहे. 20 कोटी जनतेला विमा योजनेचा लाभ झाला आहे. 2  कोटी 47 लाख घरांना वीज जोडणी केली असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. रेरा कायद्यानुसार बिल्डर लॉबीवर लगाम घालण्यात आला आहे. सरकारकडून 1 कोटी 30 लाख घरांची निर्मिती झाली असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोबतच तिहेरी तलाकचा निर्णय घेत मुस्लिम भगिनींना  दिलासा दिला असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. सरकारने एक कोटी युवकांना कौशल विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले आहे. या योजनेचा लाभ 4 कोटीपेक्षा अधिक युवकांनी घेतला आहे. भारताचे नाव स्टार्ट अप मध्ये आघाडीवर आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
Embed widget