एक्स्प्लोर

लोकशाही मूल्यांविषयी कटिबद्ध राहायला हवं; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशवासियांना आवाहन

न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहुयात, असं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात देशवासियांना केलं.

नवी दिल्ली : उद्या साजऱ्या होत असलेल्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशावासियांना संबोधित केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाने आपल्याला काही अधिकार बहाल केलेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवं, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना केलं. देशातील अनेक विषय आणि योजनांवर राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात भाष्य केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - स्वच्छ भारत अभियान - नागरिकांच्या सहभागामुळे 'स्वच्छ भारत अभियानाने' खूप कमी दिवसात चांगले यश मिळवले आहे. लोकसहभागाची हिच भावना अन्य क्षेत्रांमध्येही असायला हवी. मग ते गॅसची सबसिडी सोडणे असो किंवा डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे असो. उज्ज्वला योजना - प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून लोकांच्या घराघरात गॅस पोहचला. माहितीनुसार आठ कोटी जनतेनी याचा लाभ घेतला आहे. देशाच्या प्रत्येक भागाचा विकास होणार - जम्मू काश्मीर, लडाख असो की ईशान्येकडील राज्य असो. देशाच्या प्रत्येक भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करीत आहे. लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवं - संविधानाने आपल्याला लोकशाही अधिकार दिले आहेत. पण, न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी आपण कटिबद्ध राहायला हवे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 14 कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रतिवर्ष मिळत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना सन्मामाने जगण्यासाठी मदत मिळाली. जलशक्ती मंत्रालय - पाण्याच्या संकटाशी लढण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. जलसंरक्षण ही या मंत्रालयाची प्राथमिकता आहे. मला विश्वास आहे, की 'जल जीवन मिशन' सुद्धा स्वच्छ भारत अभियानासारखे यशस्वी होईल. जीएसटी - जीएसटीमुळे एक देश, एक कर, एक बाजार, या संकल्पनेला मूर्त स्वरुप मिळाले. यासोबतच 'ई-नाम' द्वारे 'एका राष्ट्रासाठी एक बाजार'ची प्रक्रिया यशस्वी होईल. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - सरकारने आपल्या महत्वकांशी योजनांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या योजनांमधून आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहचवण्यास मदत झाली. National Bravery Award | महाराष्ट्रातील दोन मुलांचा बाल शौर्य पुरस्काराने सन्मान | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget