एक्स्प्लोर

Mann Ki Baat Highlights: सरोवर, तृणधान्य, सण ते डिजिटल इंडिया; पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान मोदी (PM Modi Live) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत ​​महोत्सवानिमित्त झालेल्या देशभरातील कार्यक्रमाचं कौतुक केलं.

PM Modi Live Mann Ki Baat:  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Live) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत ​​महोत्सवानिमित्त झालेल्या देशभरातील कार्यक्रमाचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याची माहिती दिली. 

पंतप्रधानांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे 

पंतप्रधानांनी म्हटलं की,  अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले.  स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत ​​महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणि युवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृत धारा बरसत आहे. 

आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे.अमृत ​​महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे. 

आपल्या पूर्वजांचे ज्ञान, आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी आणि आपल्या पूर्वजांचे चिंतन आजही किती महत्त्वाचे ठरते आहे, हे आपल्याला समजते, जेव्हा आपण त्याबद्दल सखोल माहिती मिळवतो, तेव्हा आपण आश्चर्याने थक्क होतो. 

पाण्या, तू आमचा रक्षक आहेस आणि आम्हाला सर्व वाईटांपासून दूर ठेवणारा आहेस. तूच सर्वश्रेष्ठ औषध आहे आणि तूच या विश्वाचे पालनपोषण करणारा आहेस. चार महिन्यांपूर्वी 'मन की बात'मध्ये मी अमृत सरोवराचा उल्लेख केला होता. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने जमवाजमव केली, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक एकत्र आले आणि बघता-बघता अमृत सरोवराची उभारणी ही लोकचळवळ झाली आहे.

देशासाठी काहीतरी करण्याची प्रखर भावना मनात असते, कर्तव्याची जाणीव असते, येणाऱ्या पिढ्यांची काळजी असते, तेव्हा बळही मिळते आणि संकल्प उदात्त होऊन जातो. 

अमृत ​​सरोवर बनवण्यासाठी गावातील लोकांनी डोंगरावरून येणारे सर्व पाणी, चर खोदून एका बाजूला वळवले. त्यामुळे या परिसरातला पुराचा प्रश्नही सुटला अमृत ​​सरोवर मोहिम आपल्या आजच्याच अनेक समस्या सोडवते असे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठीही ही मोहिम तितकीच आवश्यक आहे. अमृत ​​सरोवर मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी जुन्या जलाशयांचाही कायापालट केला जातो आहे.

 जनावरांची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीसाठी या अमृत ​​सरोवरांचा उपयोग केला जात आहे.या तलावांमुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर या परिसरातसगळीकडे हिरवळही वाढते आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी लोक अमृत सरोवरात मत्स्यपालन करायच्या तयारीत आहेत.मी तुम्हा सर्वांना, विशेषत: माझ्या युवा सहकाऱ्यांना विनंती करतो की अमृत सरोवर मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जलसंधारण आणि जलसंरक्षणासाठीच्या प्रयत्नांना बळ द्या, ते यशस्वी करून दाखवा.

चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यांनी मायगव्हवर लिहिले आहे की जेमतेम पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे.'मन की बात' च्या पुढच्या भागात तुम्ही बाजरीवर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले आहे. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल

आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे. आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना, भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे.आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ वाढण्यात यावेत

भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे. तृणधान्याचा हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्याविषयी जागरूकता वाढवायची आहे. मित्रांनो, तृणधान्ये शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर आहेत. ही पिके खूप कमी वेळात तयार होतात, आणि त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही.आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी तर तृणधान्ये विशेष फायदेशीर आहेत. तृणधान्यांचा पेंढा देखील सर्वोत्तम चारा मानला जातो

इतर महत्वाच्या बातम्या

Mann Ki Baat LIVE : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे रंग केवळ भारतातच नाही तर जगभरात; पंतप्रधानांकडून कौतुक

PM Modi : येणारं वर्ष बाजरी वर्ष! पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांनो तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Sunetra Pawar on Maharashtra Rains : अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
Cars GST Price Cut : GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Sunetra Pawar on Maharashtra Rains : अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
अतिवृष्टी आपल्या हातात नसली तरी, माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट, म्हणाल्या...
Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली...
Cars GST Price Cut : GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर
Dharashiv Solapur Heavy Rain: गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून... प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले
Wet Drought in Maharashtra: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग, कृषीमंत्री अन् मदत-पुनवर्सन मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग, कृषीमंत्री अन् मदत-पुनवर्सन मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
Ladki Bahin Yojana: सरकारने आमच्या घरात भांडणं लावली, निवडणूक संपल्यावर आमचे 1500 रुपये बंद केले, हिंगोलीत लाडक्या बहिणी आक्रमक
सरकारने आमच्या घरात भांडणं लावली, निवडणूक संपल्यावर आमचे 1500 रुपये बंद केले, हिंगोलीत लाडक्या बहिणी आक्रमक
परंड्यातील वडनेरमध्ये पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं, NDRF च्या साथीनं ओम राजेनिंबाळकर स्वत: पाण्यात उतरले, 18 तासानंतर सुखरुप सुटका
परंड्यातील वडनेरमध्ये पुरात कुटुंब अन्न पाण्याविना अडकलं, NDRF च्या साथीनं खासदार ओम राजेनिंबाळकर मदतीला, 18 तासानंतर सुखरुप सुटका
Embed widget