एक्स्प्लोर

Ajit Doval News: नेताजी सुभाषचंद्र बोस हे अत्यंत धार्मिक, ते असते तर भारताची फाळणी कधीच झाली नसती: अजित डोवाल

NSA Ajit Doval On Netaji Subhas Chandra Bose: नेताजी सुभाषचंद्र बोस हे धार्मिक होते तसेच गांधीजींना आव्हान देणारे एकमेव नेते असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले. 

नवी दिल्ली: भारताचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्या हाती असतं तर भारताची फाळणी कधीच झाली नसती असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA Ajit Doval) म्हणाले. पाकिस्तानचे निर्माता मोहम्मद अली जिना यांनीही सुभाषचंद्र बोस या एकमेव व्यक्तीलाच आपण नेता म्हणून स्वीकारू शकतो असं वक्तव्य केल्याचंही अजित डोवाल यांनी सांगितलं. नवी दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल लेक्चर या कार्यक्रमात अजित डोवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस हे अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्व होतं, ते एकमेव नेते होते ज्यांच्यात महात्मा गांधींना आव्हान देण्याची क्षमता होती, तसेच त्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांसमोर कधीही भीक मागितली नसल्याचं अजित डोवाल म्हणाले. 

अजित डोवाल म्हणाले की, "सुभाषचंद्र बोस यांच्यावर इतिहासाने अन्याय केला आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या इतिहासाचे पुनर्लेखनाला पाठिंबा दिल्याने आपण आनंदी आहोत. 1962 साली आपल्या देशाची युद्धाची कोणतीही तयारी नव्हती, त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला."

 

जपानने नेताजींना पाठिंबा दिला

अजित डोवाल म्हणाले की, "नेताजी एकटे होते, त्यांना पाठिंबा देणारा जपानशिवाय दुसरा देश नव्हता. नेताजी म्हणाले होते की, मी पूर्ण स्वातंत्र्यापेक्षा कमी कशावरही तोडगा काढणार नाही. त्यांना या देशाला केवळ राजकीय गुलामीतून मुक्त करायचे नव्हते, तर लोकांची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता बदलायची होती. नागरिकांना मुक्त जीवन जगता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते."

नेताजी असते तर भारताची फाळणी झाली नसती

नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले की, "नेताजींच्या मनात विचार आला की मी इंग्रजांशी लढेन, मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही. हा माझा हक्क आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे. सुभाषचंद्र बोस असते तर भारताची फाळणी झाली नसती. पाकिस्तानचे निर्माते जिना एकदा म्हणाले होते की ते केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाच नेता म्हणून स्वीकारू शकतील.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, "नेताजींच्या महान प्रयत्नांवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. महात्मा गांधीही त्यांचे प्रशंसक होते. परंतु लोक अनेकदा तुमच्या अंतिम परिमामावरून तुमचा न्याय करतात. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांचे संपूर्ण प्रयत्न व्यर्थ गेले असं काही लोकांची मानसिकता आहे. इतिहास नेताजींबद्दल निर्दयी राहिला आहे. आता मला खूप आनंद आहे की पंतप्रधान मोदी त्याचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक आहेत."


ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Embed widget