Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे मुंबई हवामान केंद्राकडून आवाहन करण्यात आले आहे.मुंबईत सरासरी तापमानापेक्षा 6.4 अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra weather alert: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. किनारपट्टी भागातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आज मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि मुंबईत उष्ण व आर्द्र हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील पाच दिवस हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात शुष्क वाऱ्यांमुळे तापमानाची धग अधिक जाणवत आहे. (Heat Wave)
हवामान विभागाचा इशारा काय?
मुंबईत आजसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईत आज तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मुंबई उपनगरात काही भागात 43 अंश सेल्सिअसपर्यंत देखील तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल राम मंदिर परिसरात 42.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे मुंबई हवामान केंद्राकडून आवाहन करण्यात आले आहे.मुंबईत सरासरी तापमानापेक्षा 6.4 अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या तीन जिल्ह्यांसह रायगडसाठीदेखील यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भातही अकोल्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोल्यात काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज, तापमानात मोठी वाढ नाही. भारतीय हवामान केंद्राने 10 आणि 11 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी उष्ण आणि आर्द्र हवामान राहणार असल्याचे सांगितला आहे.
उष्णतेचे अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
ऑरेंज अलर्ट- मुंबई, पालघर, ठाणे
येलो अलर्ट- रायगड, अकोला

आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 37.6° तापमानाची नोंद झाली. बीड 38.3, जळगाव 39.6, धाराशिव 38, उदगीर 36.6, सोलापूर 39.4 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मुंबई- कुलाबा येथे 35.9 अंश सेल्सिअस तर सांताक्रुज मध्ये 38.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली. रत्नागिरी 34.6 सांगली 38.2 सातारा 37.3 अंशावर गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















