एक्स्प्लोर

उत्तराखंडनंतर आता थेट मोदींच्या गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु, मराठी न्यायमूर्तींना मोठी जबाबदारी

न्यायमूर्ती देसाई यांच्याशिवाय या पॅनेलमध्ये अन्य चार तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यासाठी विस्तृत मसुदा तयार करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.

Gujarat UCC Committee : गुजरात सरकारने राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यासाठी नवीन समिती (Gujarat UCC Committee) स्थापन केली आहे. या पाच सदस्यीय समितीच्या अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई असतील. यापूर्वी त्यांनी उत्तराखंडमध्ये यूसीसी मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. गुजरात सरकारचा हा उपक्रम देशात समान कायदे लागू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या समितीची घोषणा करताना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, “भारतीयत्व हा आपला धर्म आहे आणि संविधान हा आपला पवित्र ग्रंथ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर समान अधिकार लागू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

समितीत कोणाचा समावेश?

न्यायमूर्ती देसाई यांच्याशिवाय या पॅनेलमध्ये अन्य चार तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातमध्ये (Uniform Civil Code in Gujarat) समान नागरी संहिता लागू करण्यासाठी विस्तृत मसुदा तयार करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.

  • सीएल मीना : निवृत्त आयएएस अधिकारी
  • आर सी कोडेकर : ज्येष्ठ वकील
  • दक्षेश ठकार : शिक्षणतज्ज्ञ
  • गीताबेन श्रॉफ : सामाजिक कार्यकर्त्या

कोण आहेत न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई?

न्यायमूर्ती देसाई हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. 1970 च्या दशकात मुंबईत त्यांचा कायदेशीर प्रवास सुरू झाला. प्राथमिक शिक्षण मुंबईमधील बालमोहनमधून घेतल्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस सी प्रताप यांच्या कनिष्ठ म्हणून काम केले आणि नंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केले. 1979 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्या प्रतिबंधात्मक अटकेच्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकील बनल्या. त्यांचे कायदेशीर कौशल्य आणि निःपक्षपातीपणा लक्षात घेऊन 1996 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवण्यात आले.

निवृत्तीनंतरही सक्रिय भूमिका

सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही न्यायमूर्ती देसाई यांनी न्यायालयीन आणि प्रशासकीय कामकाजात सक्रिय राहून काम केले. 2014 मध्ये त्यांची इलेक्ट्रिसिटी अपिलेट ट्रिब्युनलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 मध्ये त्या ॲडव्हान्स रुलिंग अथॉरिटीच्या अध्यक्षा झाल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी सीमांकन आयोगाचे नेतृत्व केले, ज्याने जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेच्या सात नवीन जागा निर्माण करण्यात आल्या, एकूण जागांची संख्या 90 झाली. याव्यतिरिक्त, त्यांनी लोकपाल निवड समितीच्या शोध समितीचे नेतृत्व केले, ज्यांनी लोकपालसाठी नावांची शिफारस केली.

उत्तराखंडमध्ये UCC लागू करणारे पहिले राज्य सरकार

दरम्यान, उत्तराखंड सरकारने गेल्या आठवड्यातच समान नागरी संहिता लागू करण्याची घोषणा केली. न्यायमूर्ती देसाई यांच्या नेतृत्वाखालील समितीने उत्तराखंडमध्ये अहवाल सादर केल्यानंतर एक वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडपाठोपाठ आता गुजरातही या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देशभरात समान नागरी संहिता लागू करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. न्यायमूर्ती देसाई यांच्या अध्यक्षतेखालील गुजरात सरकारची ही समिती राज्यात UCC लागू करण्यासाठी ठोस कायदेशीर आधार तयार करेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Embed widget