एक्स्प्लोर

Mirza Ghalib Birth Anniversary: 'पूछते हैं वो कि 'ग़ालिब' कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाएं क्या', गालिबच्या शायरीची जादू आजही कायम

Mirza Ghalib Birth Anniversary: मिर्झा असदुल्लाह बेग खान ज्यांना आपण सगळे मिर्झा 'गालिब' या नावाने ओळखतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊ..

Mirza Ghalib Birth Anniversary: मिर्झा असदुल्लाह बेग खान ज्यांना आपण सगळे मिर्झा 'गालिब' (Mirza Ghalib) या नावाने ओळखतो. त्यांच्या शायरीमुळे ते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी जरी फारशी भाषेत शायरी लिहिण्यास सुरुवात केली असली, तरी ते पुढे उर्दू भाषेतील शायर म्हणून खूप प्रसिद्ध झाले. म्हणूनच गालिब (Mirza Ghalib) यांना उर्दू-फारसी भाषेतील सर्वकालीन महान शायर म्हटले जाते. गालिब यांनी शायरी आणि गझलला नवे रूप दिले. अनेकजण गालिब यांची गझल केवळ प्रेमाच्या संदर्भात पाहतात. मात्र त्यांनी आपल्या गझलेतून जीवनाचे तत्वज्ञान आणि रहस्य देखील मांडले आहे. आज त्यांची जयंती असून याच निमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ..

मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 रोजी उत्तरे प्रदेशमधील आग्रा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अब्दुल्ला बेग आणि आईचे नाव इज्जत उत निसा बेगम होते. गालिब जेव्हा फक्त 5 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. पण काही काळाने काकांचंही निधन झालं. त्यानंतर ते आपल्या आजोबांकडे आले. वयाच्या 13 व्या वर्षी उमराव बेगम यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी वयाच्या 11 व्या वर्षी उर्दू आणि पर्शियन भाषेत शायरी आणि गझल लिहायला सुरुवात केली. ते असे शायर होते की, उभ्या उभ्या गझल रचायचे. यामुळेच गालिब हे भारत-पाकिस्तानसह जगभरातील कोट्यवधी लोकांचे आवडते शायर आहेत. गालिब यांच्या अनेक गझल आणि शेर लोकांना तोंडपाठ आहेत. 1850 मध्ये अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफरने मिर्झा गालिब यांना दबीर-उद-मुल्क आणि नज्म-उद-दौला या पदव्या बहाल केल्या होत्या. यानंतर त्यांना मिर्झा नोशा ही पदवीही मिळाली.

उर्दू भाषेचे शायर म्हणून मिर्झा गालिब (Mirza Ghalib Shayari) यांचे नाव आजही लोक आदराने घेतात. पण तुम्हाला माहित आहे का मिर्झा गालिब यांनी केवळ गझल आणि शायरीच नाही तर अनेक पत्रेही लिहिली आहेत. त्यांच्या पत्रांबद्दल असं म्हटलं जातं की, गालिबचं पत्र वाचल्यावर गालिब वाचकाशी बोलत असल्याचा भास होतो. गालिब यांनी गझल लिहिली नसती तर त्यांची पत्रे खूप प्रसिद्ध झाली असती, असेही म्हटले जाते. 15 फेब्रुवारी 1869 रोजी मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांचे निधन झाले. त्यांना हजरत निजामुद्दीनच्या (दिल्ली) दर्गाजवळ दफन करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूच्या इतक्या वर्षांनंतरही आपल्या शायरीतून ते आजही जिवंत आहेत. 

SHAYARI OF MIRZA GHALIB: गालिब यांचे काही निवडक शेर 

हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन,
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है. 

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. 

उन के देखे से जो आ जाती है मुँह पर रौनक़,
वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है.

न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता, 
डुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता.

बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे,
होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UPSC Result : भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Commercial CNG Gas Nagpur: अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget