एक्स्प्लोर

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही कावेरीचा पाणी प्रश्न कायम

बंगळुरुः कर्नाटकात कावेरी पाण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. सुप्रीम कोर्टाने आज कावेरीतून तामिळनाडूला पुढचे दहा दिवस दररोज 12 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा आदेश दिल्यानंतर कन्नडिगा रस्त्यावर उतरले आहेत. दिवसभर बंगळुरु, म्हैसूरसह इतर शहरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.   जाळपोळीत शेकडो वाहनांचं नुकसान करण्यात आलं. तामिळनाडूच्या अनेकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. आंदोलकांचा संताप पाहता लोकांनी बाजार आणि रोजचे व्यवहार सकाळपासूनच बंद केले. त्यामुळे एरवी गजबजलेल्या रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळतोय.   दरम्यान बंगळुरुमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. लोकांनी कायदा हातात घेऊ नये, असं आवाहनही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलं आहे.   काय आहे कावेरी पाणीवाटपाचा तिढा? कावेरी नदीचा उगम कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यात होतो. ही नदी तामिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरीतून बंगालच्या उपसागराला मिळते. 1892 आणि 1924 मध्ये म्हैसूर आणि मद्रास प्रांतातील पाणीवाटप करार वादात सापडला. सुप्रीम कोर्टाने 1990 साली हा वाद कावेरी ट्रिब्युनलकडे सोपवला.   ट्रिब्युनलने 1991 साली 205 टीएमसी पाणी तामिळनाडूला देण्याचे आदेश दिले. त्यानंतर 2007 मध्ये 419 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र कमी पाऊस आणि पाणीसाठा कमी असल्याचं कारण देत कर्नाटकाने पाणी सोडण्यास विरोध केला. पण 40 हजार हेक्टरवरील सांबा पीक वाचवण्यासाठी पाण्याची गरज असल्याचा दावा तामिळनाडूने केला.   सुप्रीम कोर्टाने या वर्षी 5 सप्टेंबर रोजी 10 दिवस दररोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश कर्नाटकला दिले. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी सोडलं तर कर्नाटकमध्ये पाणी टंचाई होईल, असं पत्र लिहिलं.   त्यानंतर कर्नाटकमध्ये पाणी देण्यास तीव्र विरोध करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने आज 15 ऐवजी 12 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. तरीही कर्नाटकवासीयांनी या निर्णयाचा विरोध करत जाळपोळ करुन निषेध केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.