एक्स्प्लोर

40 रुपयांसाठी संघर्ष आता 140 कोटींची ऑफर धुडकावली, खान सरांनी सांगितला संघर्ष

Ideas of India Summit 2023 : इंग्रजी मीडियममधून हिंदी मीडियममध्ये येणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि चांगला निर्णय होता.

Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये खान सर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाची गाथा सांगितली. मुलांना कमी पैशात शिकवणं असो अथवा शिकवण्याची नवी संकल्पना, आयडिया आणि धोरण यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केले. इंग्रजी मीडियममधून हिंदी मीडियममध्ये येणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि चांगला निर्णय होता. जर हिंदी मीडियमध्ये आलो नसतो तर आज माझ्याकडे काहीही नसते. शिक्षणात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही पाहिजे, असे खान सर यांनी सांगितलं. 

शिक्षणाला आम्ही अधिक इंटरेस्टिंग करतो की त्यापासून विद्यार्थी दूर जाऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, 'आम्ही गरिबी इतक्या जवळून पाहिली आहे की लोकांनी आपल्या बायकोलाही इतक्या जवळून पाहिलं नसेल.' संघर्षाच्या काळात मित्रांनी मदत केल्याचेही सांगायला खान सर विसरले नाहीत.
 
एक कंपनीने 140 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचेही यावेळी खान सर यांनी सांगितलं. पण त्यांनी ती ऑफर धुडकावली. ते म्हणाले की, मी जर 140 कोटींची ऑफर घेतली असती तर गरिबांच्या मुलांना कुणी शिकवलं असतं. जेव्हा मी टिचिंग क्षेत्रात आलो तेव्हा मला वाटलं गरिबाची मुलेही शिक्षणाचं स्वपर्न पाहू शकतात, असे वाटलं. त्यांची मदत करायला हवं असे वाटलं.

तिकिटासाठीही नव्हते पैसे - 

मला घरी जायचे होते अन् तिकिटासाठी 90 रुपये नव्हते, हा प्रसंग मी कधीच विसरु शकत नाहीत, असे खान सर म्हणाले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र दिवस होता. माझ्या आजोबांनी मला सांगितले की, 'स्वप्ने आणि इच्छा कधीच संपत नाहीत, परंतु काही गरजा असतात. पहिल्यांदा आपल्या गरजा पाहा आणि मग स्वप्नासाठी पुढे जावा.' 

 140 कोटींची ऑफर धुडकावली -

मी एक होम ट्यूशन सुरु केले, त्यानंतर एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवायला गेलो. त्यावेळी मुलांची संख्या वाढली. त्यानंतर कोचिंगवाल्यांनी फी वाढवण्याचा निर्णय घेतला. याला मी विरोध केला अन् स्वत:चं कोचिंग सेंटर सुरु केले. त्यावेळी मला खूप विरोध झाला, कोचिंग सेंटरवर बॉम्बही फेकण्यात आला होता. सर्व काही संपले होते. त्यावेळी घरी जायचा विचार केला पण खिशात 90 रुपये सुद्धा नव्हते.... माझ्याकडे फक्त 40 रुपये होते, त्यामुळे मी घरीही जाऊ शकलो नाही. या संघर्षातूनच मार्ग काढला.. आज अनेकांना कमी पैशात शिकवण देतो, याचं समाधान मिळतेय, असे खान सर म्हणाले. नुकतेच एका कंपनीने 140 कोटींची ऑफर दिली होती. ती धुडकावली. कारण जर मी ती ऑफर घेतली असती तर गरिबांच्या मुलांना स्वत्तात कोण शिकवणार होतं? असा प्रश्न माझ्यासमोर उभा होता, असे खान सर म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget