एक्स्प्लोर

राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस पत्ते खोलणार, महात्मा गांधींच्या नातवाला मैदानात उतरवणार?

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होणार आहे. गेले कित्येक दिवसांपासून या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत राजकीय खलबतं सुरु आहेत. एनडीएचा उमेदवार कोण असणार याबद्दल सस्पेन्स अजून कायम आहे. पण आज पहिल्यांदाच यूपीएकडून गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावावर चर्चा सुरु असल्याचं समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्लिश वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिल्यानं राजधानीतली हवा पुन्हा गरम झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीए महात्मा गांधींच्या नातूंना उतरवण्याच्या तयारीत आहे का? इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानंतर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. महात्मा गांधींचे नातू आणि बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी हे यूपीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. स्वत: गोपाळकृष्ण गांधी यांनीच यासंदर्भातली प्राथमिक चर्चा राजकीय पक्षांनी आपल्याशी केल्याचं मान्य केलं आहे. अर्थात ही प्राथमिक स्तरावरचीच चर्चा आहे. पण तरीही या निमित्तानं यूपीएचे पत्ते नेमके कुठल्या दिशेनं पडत आहेत हे समोर आलं आहे. राष्ट्रपतीपदाबद्दल एनडीएचा उमेदवार कोण असेल यावरुनच यूपीएची रणनीती ठरणार आहे. त्यामुळेच इतक्यात नाव जाहीर करण्याची घाई केली जाणार नाहीय. पण जर भाजपकडून संघाशी निगडीत एखादं नाव समोर आलं, तर त्याला चोख उत्तर म्हणून गांधीचे नातू म्हणून गोपाळकृष्ण गांधी यांना उभं केलं जाईल. आकड्यांच्या लढाईत यूपीएनं ही लढाई हारली तरी या लढाईला एक प्रतिकात्मक अर्थ देण्याचा यूपीएचा प्रयत्न आहे. गोपाळ गांधींसोबतच लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांच्याही नावाची चर्चा आहे. जर एनडीएनं झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचं नाव पुढं केलंच तर कदाचित त्यांना उत्तर देण्यासाठी मीरा कुमार यांनाही मैदानात उतरवलं जाऊ शकतं. गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची सर्वाधिक पसंती आहे. शिवाय तृणमूलशी विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले डावेही या नावावर त्यांची साथ द्यायला तयार आहेत. कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?
  • महात्मा गांधींचे सर्वात लहान पुत्र देवदास गांधी यांचे पुत्र आहेत गोपाळकृष्ण
  • 72 वर्षाच्या गोपाळकृष्ण यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत काम केलेलं आहे
  • 1992 ला स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतरही अनेक महत्वाच्या पदांवर काम
  • 2004 ते 2009 या यूपीएच्या काळात ते बंगालचे राज्यपालही होते
  • नंदीग्राममधल्या हिंसेचा उघड निषेध केल्यानं बौद्धिक वर्तुळात आदर
  • विक्रम सेठ यांच्या ‘सुटेबल बॉय’ या कादंबरीचं हिंदी भाषांतर
  • औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह याच्यावर त्यांनी एक नाटकही लिहिलंय.
अर्थात गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावार सगळ्याच विरोधी पक्षांचं एकमत होणार का याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. कारण काही राजकीय पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही नावाबद्दल आग्रही आहेत. पवारांना उमेदवार केल्यास भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष शिवसेनाच आपल्यासोबत येऊ शकतो, त्यामुळे लढत कडवी होईल असा त्यांचा अंदाज. पण विजयाची खात्री असल्याशिवाय पवार कुठल्या निवडणुकीत उतरत नाहीत असा आजवरचा इतिहास सांगतो. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, सुमित्राताई महाजन, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू ही एनडीएकडून चर्चेत असलेली नावं. नेहमीप्रमाणे याहीवेळी मोदींच्या मनात काय आहे यांचा थांगपत्ता लागणं कठीण आहे. एक मात्र खरं आहे की संघाशी निगडीत एखादं नाव समोर आलं तर गांधी विरुद्ध संघ ही प्रतिकात्मक लढाई विरोधकांना हवीच असेल. त्यामुळेच आता काँग्रेस खरंच या नावावर शिक्कामोर्तब करणार का याची उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget