एक्स्प्लोर

Goa Liberation Day 2022 : तब्बल 14 वर्षानंतर गोवा स्वतंत्र कसा झाला? वाचा गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास

Goa Liberation Day 2022 : 1947 साली भारत स्वतंत्र झाला. पण, महाराष्ट्राशेजारील गोव्याच्या जनतेला पोर्तुगीजांच्या जाचातून स्वतंत्र होण्यासाठी तब्बल 14 वर्षांचा संघर्ष करावा लागला.

Goa Liberation Day 2022 : गोवा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी आणि प्रसिद्ध वास्तुकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे गोवा पर्यटनाच्या दृष्टीने जगभरातील लोकांना आकर्षित करतो. पोर्तुगीजांनी येथे 450 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, जेव्हा पोर्तुगीजांना गोवा भारताच्या स्वाधीन करण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांनी नकार दिला. इंग्रज सरकारनेही पोर्तुगीजांची बाजू घेत भारतापासून वेगळे ठेवले, पण भारताने 19 डिसेंबर 1961 रोजी ऑपरेशन विजयच्या माध्यमातून गोवा स्वतंत्र केला, प्रथम त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला, त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोवा बनला. भारताचे 25 वे राज्य असलेल्या गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास जाणून घ्या. 

गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास

पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षे राज्य केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या 14 वर्षानंतर भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या 36 तासांत गोवा मुक्त केला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला हे स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. गोवा हा नेहमीच स्वतंत्र भारताचा भाग नव्हता. 1961 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते भारतीय राज्य बनले. संपूर्ण लष्करी कारवाई यशस्वीपणे पार पडण्यासाठी सुमारे तीन दिवस लागल्याचे सांगण्यात येत आहे. आणि त्याच ऐतिहासिक घटनेच्या सन्मानार्थ, गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. भारतीय इतिहासातील हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, ज्याने आपल्या देशाला अनेक शतके चाललेल्या परकीय राजवटीतून पूर्णपणे मुक्त केले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरु केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणं, बोलणंही सेन्सॉर केलं. आणि गोव्याला पोर्तुगीजांची वसाहत म्हणून मान्यता असल्यानं भारतीय लोक इथं घुसखोरीचा प्रयत्न करतायत अशी बोंब मारली.

पोर्तुगीजांनी गोव्यात पाऊल ठेवल्यानंतर आपलं खरं रुप दाखवलं. कारण इंग्रजांसारखं केवळ व्यापार करणं एवढंच पोर्तुगीजांचं ध्येय नव्हतं. गोव्यात आत्ताप्रमाणच त्याकाळीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांची जगण्याची पद्धत वेगवेगळी होती. खानपान, प्रतिकं वेगवेगळी होती, मात्र त्यात संघर्ष नव्हता. पण पोर्तुगीजांनी इथं आल्यानंतर धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरु केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरु केले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोवन जनता कंटाळली होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरु केली. 

भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारतीय प्रजासत्ताकचे 25 वे राज्य बनले.

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in December 2022 : महापरिनिर्वाण दिन, वर्षातील शेवटचा महिना यांसह डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
Embed widget