एक्स्प्लोर

Goa Liberation Day 2022 : तब्बल 14 वर्षानंतर गोवा स्वतंत्र कसा झाला? वाचा गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास

Goa Liberation Day 2022 : 1947 साली भारत स्वतंत्र झाला. पण, महाराष्ट्राशेजारील गोव्याच्या जनतेला पोर्तुगीजांच्या जाचातून स्वतंत्र होण्यासाठी तब्बल 14 वर्षांचा संघर्ष करावा लागला.

Goa Liberation Day 2022 : गोवा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी आणि प्रसिद्ध वास्तुकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे गोवा पर्यटनाच्या दृष्टीने जगभरातील लोकांना आकर्षित करतो. पोर्तुगीजांनी येथे 450 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, जेव्हा पोर्तुगीजांना गोवा भारताच्या स्वाधीन करण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांनी नकार दिला. इंग्रज सरकारनेही पोर्तुगीजांची बाजू घेत भारतापासून वेगळे ठेवले, पण भारताने 19 डिसेंबर 1961 रोजी ऑपरेशन विजयच्या माध्यमातून गोवा स्वतंत्र केला, प्रथम त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला, त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोवा बनला. भारताचे 25 वे राज्य असलेल्या गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास जाणून घ्या. 

गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास

पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षे राज्य केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या 14 वर्षानंतर भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या 36 तासांत गोवा मुक्त केला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला हे स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. गोवा हा नेहमीच स्वतंत्र भारताचा भाग नव्हता. 1961 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते भारतीय राज्य बनले. संपूर्ण लष्करी कारवाई यशस्वीपणे पार पडण्यासाठी सुमारे तीन दिवस लागल्याचे सांगण्यात येत आहे. आणि त्याच ऐतिहासिक घटनेच्या सन्मानार्थ, गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. भारतीय इतिहासातील हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, ज्याने आपल्या देशाला अनेक शतके चाललेल्या परकीय राजवटीतून पूर्णपणे मुक्त केले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरु केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणं, बोलणंही सेन्सॉर केलं. आणि गोव्याला पोर्तुगीजांची वसाहत म्हणून मान्यता असल्यानं भारतीय लोक इथं घुसखोरीचा प्रयत्न करतायत अशी बोंब मारली.

पोर्तुगीजांनी गोव्यात पाऊल ठेवल्यानंतर आपलं खरं रुप दाखवलं. कारण इंग्रजांसारखं केवळ व्यापार करणं एवढंच पोर्तुगीजांचं ध्येय नव्हतं. गोव्यात आत्ताप्रमाणच त्याकाळीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांची जगण्याची पद्धत वेगवेगळी होती. खानपान, प्रतिकं वेगवेगळी होती, मात्र त्यात संघर्ष नव्हता. पण पोर्तुगीजांनी इथं आल्यानंतर धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरु केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरु केले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोवन जनता कंटाळली होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरु केली. 

भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारतीय प्रजासत्ताकचे 25 वे राज्य बनले.

महत्त्वाच्या बातम्या : 

Important Days in December 2022 : महापरिनिर्वाण दिन, वर्षातील शेवटचा महिना यांसह डिसेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
फक्त 45 रुपयांची बचत करा, 25 लाख रुपयांचा निधी मिळवा, 'ही' आहे LIC ची भन्नाट योजना
फक्त 45 रुपयांची बचत करा, 25 लाख रुपयांचा निधी मिळवा, 'ही' आहे LIC ची भन्नाट योजना

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
Ashok Kharat: धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
Bigg Boss Marathi 6: प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
Pune Crime: 'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
Sanjay Gaikwad:
"माहिती अधिकाराचे 'हिXX' धंदे मी करत नाही, घरात चौकशी करा!"; संजय गायकवाडांची श्वेता महालेंवर जहरी टीका, म्हणाले, 'पाठीत खंजीर खुपसणे आम्हाला...'
BMC Transfer: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
मुंबई महानगरपालिकेतील बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या, महापौर रितू तावडेंच्या वॉर्डातील 'त्या' अधिकाऱ्याची ट्रान्सफर
Embed widget