एक्स्प्लोर

Coronavirus Lockdown : राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; देशातील स्थिती काय?

ईशान्येकडील अनेक राज्यांत लॉकडाऊन वाढवला तर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरादिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला

महाराष्ट्रात 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिले. राज्यातील 21 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही 10 टक्क्यांवर आहे. त्यामुळे सध्या कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. राज्यात 1 जूननंतरही निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही.

काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात काय स्थिती?

दरम्यान केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यात 9 जूनपर्यंत निर्बंध वाढवण्याची घोषणा केली तर पुडुचेरी सरकारने केंद्र शासित प्रदेशात लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूने यापूर्वीच लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढविला आहे. तर कर्नाटकात लोकांनी सहकार्य केलं आणि जर कोरोनाच्या आकडेवारीत घट झाली तर लॉकडाऊन वाढविण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलं आहे. कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता?

दिल्लीतील लॉकडाऊन उद्या 31 मे सकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. दिल्ली सरकारने उद्यापासून लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण लॉकडाउनचे निर्बंध 7 जूनपर्यंत लागू राहणार. डीडीएमएने विद्यमान लॉकडाऊन एका आठवड्यात वाढविला आहे. लॉकडाऊन दरम्यान कामगारांना बांधकाम साईटवर जाण्याची परवानगी दिली जाईल परंतू त्यांना प्रवासासाठी ई-पास घ्यावे लागतील.

मध्य प्रदेशात लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढवला

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, 1 जूनपासून राज्यात 'कोरोना कर्फ्यू'वरील निर्बंधात थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, पण पुढच्या आठवड्यापर्यंत लॉकडाउन संपूर्ण राज्यात लागू राहील. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश सरकारने शुक्रवारी लॉकडाऊन 7 जूनपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.

ईशान्येकडील राज्यांत लॉकडाऊनमध्ये वाढ

ईशान्येकडील अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. नागालँडमध्ये 11 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जूनपर्यंत सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असेल. त्याचबरोबर मणिपूर सरकारने 11 जूनपर्यंत सात जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरमची राजधानी आईजोल कॉर्पोरेट क्षेत्रातही 6 जूनपर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात मेघालय सरकारने संपूर्ण लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
Embed widget