एक्स्प्लोर

आधारशी लिंक नसल्याने UIDAI प्रकल्प व्यवस्थापकांचंच सिम कार्ड बंद!

सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2018 पर्यंतची मुदत दिली आहे.

कर्नाटक : बंगळुरुतील एका दूरसंचार कंपनीने एका व्यक्तीचं सिम कार्ड आधारशी लिंक नसल्याने बंद केलं. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचं हे सिम कार्ड होतं, ती व्यक्ती आधार कार्ड जारी करणारी संस्था आधार प्राधिकरणाचे (UIDAI) प्रकल्प व्यवस्थापक आहेत. प्रकल्प व्यवस्थापक प्रभाकर एचएल कर्नाटकात सेंटर फॉर ई-गव्हर्नन्ससाठी काम करतात. सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2018 पर्यंतची मुदत दिली आहे. या तारखेपूर्वी कोणतीही कंपनी सिम कार्ड बंद करु शकत नाही. ''कंपनीने सिम कार्ड आधारशी लिंक नसल्याने बंद केलं. ओटीपीने रिव्हेरिफिकेशन केल्याचं कंपनीला सांगितलं होतं, मात्र कनेक्शन चालू ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट आणि एक प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचं कंपनीने सांगितलं,'' अशी माहिती प्रभाकर यांनी दिली. UIDAI चा नियम काय सांगतो? दरम्यान, UIDAI च्या आदेशानुसार, ओटीपीने रिव्हेरिफिकेशन केल्यानंतर कशाचीही गरज नाही. तुम्ही ओटीपीने रिव्हेरिफिकेशन करु शकता, त्यासाठी दूरसंचार कंपनीच्या कार्यालयात जाण्याची किंवा फिंगरप्रिंट आणि इतर कागदपत्र देण्याची गरज नाही, असं UIDAI च्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे. ''गेल्या आठवड्यात सोमवारपासून सिम कार्ड बंद होतं. कस्टमर केअरला फोन करुन याबाबत विचारणा केली. तर फिंगरप्रिंट देणं गरजेचं असून त्यानंतरच सिम कार्ड चालू होईल, असं कस्टमर केअरने सांगितलं. मात्र ओटीपीने रिव्हेरिफिकेशन केलं असून याबाबतचा नियम मला माहित आहे, असं कंपनीला सुनावलं'', अशी माहिती प्रभाकर यांनी दिली. ''आमचीच संस्था लोकांना आधार कार्ड देते आणि दूरसंचार कंपनीने मलाच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला'', याबद्दल प्रभाकर यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, आधारशी लिंक नसल्याने कोणतंही सिम कार्ड बंद केलं जात नसल्याचं स्पष्टीकरण दूरसंचार कंपनीने दिलं आहे. सिम कार्ड आधारशी लिंक करण्याचा आदेश गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर सरकारकडून या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. दूरसंचार कंपन्याही त्यासाठी सतत फोन आणि मेसेज करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget