एक्स्प्लोर

India Pakistan War: युद्ध थांबताच शाहबाज शरीफांकडून क्षी जिनपिंग यांचं तोंडभरुन कौतूक, चीनही म्हणाला, 'आपली मैत्री पोलादासारखी मजबूत'

India Pakistan War ceasefire violation: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध शस्त्रसंधी करारामुळे थांबले आहे. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अमेरिका आणि चीन यांच्याकडून होत आहे.

China Supports Pakistan: अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी करार झाल्यानंतर आता चीनचा दुतोंडीपणा जगासमोर आला आहे. चीन कायमच पाकिस्तानला पाठबळ पुरवत आला आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील युद्धाच्या निमित्ताने ही बाब आणखी अधोरेखित झाली. एकीकडे चीनने (China) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack) निषेधाची भाषा केली. मात्र, दुसरीकडे शस्त्रसंधी झाल्यानंतर चीनने पाकिस्तानचा उल्लेख 'पोलादासारखा मजबूत मित्र' असा केला आहे. एवढेच नव्हे तर आम्ही पाकिस्तानचे सार्वभौमत्त्व आणि अखंडता जपण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही चीनने म्हटले. यानंतर एकीकडे पाकिस्तानच्या छुप्या दहशतवादाला बेगडी विरोध आणि दुसरीकडे भारताविरोधात पाकिस्तानची तळी उचलण्याचा चीनचा दुतोंडीपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी 'एक्स'वरुन पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी राजी असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानशी शस्त्रसंधी करार झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही चर्चांनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी चीनच्या पुढाकाराने झाल्याचा दावा होत आहे. चीन, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या देशांच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे भारत-पाक यांच्यात शस्त्रसंधी झाली, असे म्हटले जात आहे. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने समेट घडवून आणल्याचे म्हटले आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी ही पूर्णपणे द्विपक्षीय चर्चेचे फलित आहे. त्यामध्ये कोणताही बाहेरचा हस्तक्षेप झालेला नाही. पाकिस्तान कोणत्याही अटी-शर्तींशिवाय या शस्त्रसंधीसाठी राजी झाल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांनी मानले चीनचे आभार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा होताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना उद्देशून भाषण केले होते. यावेळी शाहबाज शरीफ यांनी चीनचे आभार मानले. मी चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि तेथील जनतेचे आभार मानतो. गेल्या 58 वर्षांपासून तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात, असे शाहबाज शरीफ यांनी म्हटले.

चीनकडून प्रादेशिक राजकारणात पाकिस्तानचा प्यादासारखा वापर

चीनविषयी भारतात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाच्या विचारसरणीनुसार चीन हा राजनैतिक समस्यांबाबत संतुलित भूमिका घेणारा देश आहे. तर काहींच्या मते चीन हा पाकिस्तानच्या बाजूला झुकलेला आहे. तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, चीनकडून सध्या दक्षिण आशियाई परिसरात आपली पकड मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी चीनकडून पाकिस्तानचा प्यादासारखा वापर केला जात आहे. तर भारताशीही राजनैतिक संबंध सुरळीत ठेवण्यासाठी चीनकडून दहशतवादाबाबत भाष्य केले जाते. अशाप्रकारे चीन दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहे.

भारताने अद्याप चीनच्या या दुतोंडी भूमिकेबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. आगामी काळात या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होणार, हे पाहावे लागेल. 

आणखी वाचा

कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू म्हणणाऱ्या चीनचा अजित डोवालांना फोन, म्हणाले....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UPSC Result : भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Commercial CNG Gas Nagpur: अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget