एक्स्प्लोर

मोठी बातमी! अहमदनगर जिल्ह्यातून सोडलेलं पाणी जायकवाडीत दाखल होण्यास सुरवात

Jayakwadi Dam : अहमदनगरच्या निळवंडे धरणातून सोडलेले पाणी जायकवाडीत दाखल होण्यास सुरवात झाली असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) दाखल होण्यास सुरवात झाली असून, रात्री उशिरा जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पाणी दाखल झाले आहे. अहमदनगरच्या निळवंडे धरणातून (Nilwande Dam) सोडलेले पाणी जायकवाडीत दाखल होण्यास सुरवात झाली असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर, जायकवाडी धरणात पाणी दाखल होण्यास सुरवात झाल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे नाशिक (Nashik) धरणातून सोडण्यात आलेलं पाणी मात्र जायकवाडीत आज दाखल होणार आहे. 

दरम्यान, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडतांना प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे, पाणी सोडण्याची पूर्वतयारी म्हणून नदीकाठावरील डोंगळे (पाइप), मोटर्स काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सोबतच, वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. तसेच, अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे 8.6 टीएमसी पाण्यापैकी अधिकाधिक पाणी जायकवाडीत पोहचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे.

असे सोडले जाणार पाणी...

शासन आदेशानुसार मुळा (मांडओहोळ व मुळा) प्रकल्पातून 2.10, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून 3.36, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), 0.5, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून 2.643 टीएमसी असे एकूण 8.603 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे.

प्रत्यक्षात पोहचणार 5 टीएमसी

मागील तीन-चार वर्षांपासून सतत अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत वरील धरणातून जायकवाडीत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. ज्यात, नाशिक, नगरमधील गंगापूर, गोदावरी- दारणा, मुळा, प्रवरा, निळवंडे धरणातून हे पाणी सोडले जाणार आहे. मात्र,  8.603 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरीही प्रत्यक्षात 5 टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. त्यामुळे 35 टक्के पाणी वाया जाणार आहे. तर, एकूण 5 टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी 44 ते 45 टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Water Issue : अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले, मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
पुतणीनं काकालाच फसवलं; विश्वासानं लखनौला नेलं अन् नंतर केला घात, कोऱ्या चेकवर सह्या अन्... 72 वर्षीय व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! छ. संभाजीनगरमधील नामांकित 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' हॉटेलचे थेट परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! छ. संभाजीनगरमधील नामांकित 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात' हॉटेलचे थेट परवाने निलंबित
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Chhatrapati Sambhajinagar Crime : खळबळजनक! अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद कॅमेऱ्यात कैद, विद्यार्थाला अटक
खळबळजनक! छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद कॅमेऱ्यात कैद, विद्यार्थाला अटक

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget