एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Rain Update : तासाभरात मुसळधार पावसाने छत्रपती संभाजीनगरला झोडपून काढलं, रिक्षावर झाड कोसळलं

Chhatrapati Sambhajinagar Rain  Update : या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकरांना देखील दिलासा दिला आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Rain  Update : गेल्या अनेक दिवसांपासून खंड पडलेल्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. शहरातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी तुंबल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर, रेल्वे स्टेशन रोडवरील एमटीडीसी कार्यालयाजवळील एका रिक्षावर झाड कोसळल्याची घटना देखील समोर आली आहे. त्यामुळे याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून, झाड हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, सकाळी 11 वाजेनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर दुपारी बारा वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक भागात या पावसाने हजेरी लावली. सोबतच बिडकीन, चितेगाव, गेवराई, वैजापूर, खुलताबाद,जरुळ फाटा येथे मुसळधार पाऊस सुरू होता. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अशा जोरदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे आज झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकरांना देखील दिलासा दिला आहे. 

रेल्वे स्टेशन झाड कोसळलं...

पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा वेग अधिक असल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं चित्र दिसून येत आहे. याचवेळी रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक रोडवरील एमटीडीसी कार्यालयासमोरील एक झाड अचानक रस्त्यावर कोसळ. विशेष म्हणजे यावेळी झाडाखाली एक रिक्षा उभी होती. त्यामुळे झाड पडल्याने रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पण, मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे याची माहिती तात्काळ वाहतूक शाखेला देण्यात आली. सोबतच अग्निशमन दलाला देखील याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून देखील वाहतूक सुरळीत केली जात आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा मिळाला!

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिन्याचे देखील वीस दिवस कोरडे गेले. त्यानंतर उरलेल्या दहा दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. काल आणि आज झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान तर मिळालाच आहे, पण कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये देखील काही प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; नागनदीला पूर, घरांमध्येही पाणी शिरलं, वाहानांचं मोठं नुकसान

महत्त्वाच्या बातम्या

Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget