एक्स्प्लोर

केंद्रीय पथकाकडून आजपासून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा; दुष्काळाची करणार पाहणी

Drought : केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक मराठवाड्यात दाखल झाले असून, आज आणि उद्या  मराठवाड्यातील चार जिल्ह्यात त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ (Drought) पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहे. ज्यात मराठवाड्यातील (Marathwada) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna), बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांत हा पाहणी दौरा केला जाणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पुणे (Pune) व सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik), नंदूरबार (Nandurbar) व जळगावमध्ये (Jalgaon) हे पथक दुष्काळ पाहणी करणार आहेत. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक मराठवाड्यात दाखल झाले असून, आज आणि उद्या  मराठवाड्यातील चार जिल्ह्यात त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील काही तालुके व गावांमध्ये जाऊन हे पथक पाहणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी, तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, डोणवाडी, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या 11 गावांचा यात समावेश आहे. 

धाराशिव जिल्ह्यात आज करणार पाहणी 

केंद्राचे तीन सदस्यीय पथक आजपासून धाराशिव दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिली. शासनाने धाराशिव, वाशी व लोहारा तालुके तसेच अन्य तालुक्यातील 27मंडळे दुष्काळी घोषित केली आहेत. या अनुषंगाने दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एक त्रिसदस्यीय पथक आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. हे पथक धाराशिव तालुक्यातील ताकविकी, करजखेडा, लोहारा तालुक्यातील मार्डी, लोहारा बु, माळेगाव, धानुरी, तावशीगड येथे पाहणी करुन धाराशिवला परतणार आहे. येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन नंतर वाशी तालुक्यातील बोरी, वाशी, विजोरा व लोणखस शिवारात पाहणी करेल.

उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा दौरा 

मराठवाड्यात आज पाहणी दौरा केल्यावर हे पथक उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्या पाहणी करणार आहे. ज्यात, पुणेसोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. दोन वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून ही पाहणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पाहणी दौरे संपल्यावर पुण्यात एक महत्वाची बैठक घेऊन अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे. 

केंद्रीय पथकात यांचा समावेश...

केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात चार पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एमआयडीएचे सचिव मनोज के., सहसंचालक जगदीश साहू नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना, कापूस विकास विभागाचे संचालक डॉ. ए. एच. वाघमारे, एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया यांचा पथकात समावेश आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

राज्यात पुन्हा पाणीबाणी, 383 टँकरने पाणीपुरवठा; मराठवाड्यात भयंकर चित्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget