एक्स्प्लोर

Break The Chain : औरंगाबादमध्ये 'ब्रेक द चेन'चे सुधारित आदेश लागू; जाणून घ्या कोणत्या सेवांना मिळाली शिथिलता

महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working Days) सुरु राहतील.

औरंगाबाद : राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाच्या धर्तीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे परिणाम दिसू लागले असून, यामुळं शासनाच्याच निर्णयांनुसार काही नियमांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. तर, काही भागांमवर नव्यानं सुधारित नियमावली लागू करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही असंच काहीसं चित्र आहे. सुधारित आदेशानुसार कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Break the Chain) सुधारित अटी व शर्ती अंमजबजावणीसाठी वि विध आदेश निर्गमित केले असून, त्यात 16 एप्रिल आणि 12 मे 2021 मधील इतर सर्व बाबी कायम ठेवण्यात आलेल्या असल्याचे जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.  

Maharashtra Lockdown Relaxation : राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथील? काय सुरु, काय बंद?

औरंगाबाद शहर व जिल्हा क्षेत्राकरिता दिनांक 01 जून 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजल्यापासून 15 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत  खालील बाबी संपूर्ण औरंगाबाद जिल्हयासाठी (शहरासह) लागू करण्यात येत आहेत.    
 
1. अत्यावश्यक सेवा :
औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा (Essential Category) मधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 
2. बँक :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व बँका कामाचे सर्व दिवस (Working Days) सुरु राहतील.
 
3. अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने  (Non Essential Shops) :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने (Non Essential Shops-Stand alone shops and not inside Shopping Centres/Malls) सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.  सर्व Shopping Centres/मॉल मात्र बंद राहतील.
 
4. घरपोच सेवा सुविधा :
 रेस्टॉरंट/हॉटेल, बार- मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल / घरपोच सेवेसाठी दिनांक 16 एप्रिल आणि 12 मे 2021  रोजीच्या आदेशानुसार सुरु राहतील. औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तु- सेवा तसंच, अत्यावश्यक व्यतिरिक्त (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करण्यासही मुभा राहिल.
 
5. वैद्यकीय सेवा :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात दररोज दुपारी 3.00 वाजल्यानंतर वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक कारण (Valid Reason)/ अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) राहिल. तसेच, घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी राहिल. 
 
6. शासकीय / निमशासकीय कार्यालये :
औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्हयात सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक /कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयाव्यतिरिक्त ) 25% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.
 
7. कृषी आस्थापना :
कृषी संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 
8. मालवाहतुक :
माल वाहतूक व मालाचा पुरवठा संबधीत दुकानदार/आस्थापनेस करण्याकरिता वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत मात्र अशा दुकानदार/आस्थापना यांनी कोणत्याही परिस्थितीत माल साठवणूक करतांना या कालावधीत मालाची विक्री करु नये, मालाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाचे 
ज्या आस्थापना/दुकाने दुपारी 2.00 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे त्यांनी दुपारी 2.30 पर्यंत अथवा तत्पूर्वी अनिवार्य सर्व हिशोब आणि इतर कार्यवाही पूर्ण करुन दुकाने/आस्थापना बंद करावी. या संबंधी उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सदरील दुकाने/आस्थापना Covid-19 Pandemic संपेपर्यंत सील (Seal) करण्यात येतील याची नोंद घ्यावी असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget