एक्स्प्लोर

Amravati News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक, विभागीय कार्यालयावर जन एल्गार मोर्चा; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Bacchu Kadu Jan Elgar Morcha : आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर 'जन एल्गार मोर्चा' पुकारण्यात आला.

Amravati Prahar Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी सरकारमध्ये असूनही आज भव्य एल्गार मोर्चा पुकारला. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर 'जन एल्गार मोर्चा' पुकारण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जन एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी, मजूर लोकं उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचा मोर्चा

आज अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचा भव्य मोर्चा पुकारण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून व्हावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी शांततेत आज सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा संत गाडगेबाबा समाधी मंदिर वरून निघला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

'सत्तेत असणं म्हणजे मान खाली घालून वागणं नाही'

यावेळी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, ''आमच नातं जात आणि धर्माशी नाही तर आमचं नात दुःखी लोकांशी आहे. आजच्या मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू.'' सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही. प्रश्न सत्तेचा नाही, सत्तेत असणं म्हणजे खाली मान घालून वागणं नाही, असंही त्यांनी म्हटलं. हा मोर्चा हजारोंचा आहे पुढील लाखो लोकांचा असेल. 

बच्चू कडू यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं की, ''आता मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आणि जनतेला जागृत करण्याचं काम मी आता करणार आहे. आता लढल्याशिवाय मी राहणार नाही. आता आंदोलन करावं लागेल. आमची युती कोणासोबत नाही झाली तरी, चालेल आता आपली संघटना दहा पट वाढली पाहीजे असं काम करायचं आहे.'' तीन महिन्यात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन आता आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी एल्गार मोर्चा काढला. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत हजारो प्रहारचे कार्यकर्ते चांदूरबाजार येथून अमरावतीसाठी रवाना झाले. चांदूरबाजारमध्ये प्रहरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं हा भव्य मोर्चा पुकरला.

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget