एक्स्प्लोर

तब्बल 32 वर्षानंतर तो घरी परतला, कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी; पत्नीनं औक्षण करत केलं स्वागत

Amaravati: अमरावतीत तब्बल 32 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला एक व्यक्ती घरी परतला आहे. घरी परतलेल्या पतीला अचानक आपल्या डोळ्यासमोर पाहून पत्नीसह नातेवाईकांना गहिवरून आले आहे.

Amaravati: अमरावतीत तब्बल 32 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला एक व्यक्ती घरी परतला आहे. घरी परतलेल्या पतीला अचानक आपल्या डोळ्यासमोर पाहून पत्नीसह नातेवाईकांना गहिवरून आले आहे. इतक्या वर्षांनी पतीला समोर पाहून पत्नीला विश्वास बसत नव्हता. त्यांनी पतीला टिळा लावून औक्षण केले. त्यावेळी तेथे हजर असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. केरळच्या एर्नाकुलम येथील दिव्य करूणा ट्रस्टच्या स्वंयसेवकांनी तब्बल 18 वर्ष या व्यक्तीची सेवाशुश्रूषा करून त्यांना घरी परत आणले. 32 वर्षा नंतर पती-पत्नीच्या भेटीचा हा प्रसंग अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात असलेल्या नेकनामपूर गावातील नागरिकांनी अनुभवला. जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक शेषराव काळे यांचा तीन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. मधुकर, रमेश, पुंडलिक हे तीन भाऊ तर कमल नावाची एक बहिण आहे. पुंडलिक यांचे 1984 साली निर्मला यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्यांना वैशाली आणि दीपाली या दोन मुली झाल्या. मात्र मुलींच्या जन्मानंतर काही दिवसांतच पुंडलिक यांना मानसिक आजाराने ग्रासले व त्यातच ते कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेले. बरीच वर्षे शोधाशोध करूनही त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यानच्या काळात पत्नी निर्मला या आपल्या दोन मुलींसह माहेरी निघून गेल्या. पुंडलिक पुन्हा घरी परत येतील ही आशा देखील घरच्यांनी सोडून दिली होती. मुली लग्नाला आल्यानंतर निर्मला या परत आपल्या घरी आल्या आणि मुलींचे लग्न पार पाडून आपले जीवन जगू लागल्या. इतक्या वर्षांनी आपला नवरा परत येईल याची साधी कल्पनाही त्यांनी कधी केली नाही. मात्र हे घडलं, नियतीला काही तरी वेगळंच मान्य होतं.

पुंडलिक शेषराव काळे हे वय 60 वर्षांचे गृहस्थ जवळपास 32 वर्षा पुर्वी मेंदुवर परिणाम झाल्याने कोणाला काहीही न सांगता घर सोडुन निघून गेले. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांचा भरपुर शोध घेतला पोलीसांना देखील माहिती दिली. मात्र त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने घरच्यांनी त्यांची परत येण्याची आशा सोडली होती. तर दुसरीकडे पुंडलिक काळे हे भटकत भटकत थेट केरळ या राज्यात पोहचले. तेथे कोणी देईल ते खाऊन व जागा मिळेल तिथे झोपून ते आपले आयुष्य जगत होते. सुमारे 18 वर्षा पूर्वी केरळच्या एर्नाकुलम येथील दिव्य करूणा ट्रस्टच्या स्वंयसेवकांची नजर त्यांच्यावर पडली, त्यांनी पुंडलिक यांना आपल्या आश्रमात नेहून त्यांच्यावर तब्बल 18 वर्ष उपचार केले. मागिल महिन्यात पुंडलिक यांना पुर्वी घडलेला पुर्ण घटनाक्रम आठवला व त्यांनी त्यांचे नाव आणि पत्ता तेथिल स्वंयसेवकांना सांगितला. सदर ट्रस्टने 15 दिवसांपुर्वी चांदुर रेल्वे येथील ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून सदर ईसमाची ओळख पटविणे बाबत आणि पत्या बाबत खात्री पटविणे बाबत कळविले. ठाणेदार कुलकर्णी यांनी नाव आणि पत्ता बाबत खात्री करून केरळ मधील ट्रस्टला माहिती दिली. त्या वरून ट्रस्टचे स्वंयसेवक टोनी पालीकर, बिंदु, बिना कांजुर हे एर्नाकुलम केरळ ते चांदुर रेल्वे पर्यंत सतत संपर्कात राहून बुधवारी सकाळी पुंडलिक काळे यांना घेऊन चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला पोहचले. याबाबत नेकनापूर नेकनामपूर येथील पुंडलिंक यांचे नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पुंडलिक काळे यांना घेऊन  पोलीसांचा ताफा गावात पोहचला, त्यावेळी संपूर्ण गाव पुंडलिक काळे आणि पोलिसांच्या स्वागतासाठी सज्ज होता.

 

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यामुळं अवैध कामं करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा
तुकाराम मुंढे यांची निवृत्त होईपर्यंत त्यांची बदली करु नका, शिवसेनेच्या आमदाराची इच्छा, मंत्री झिरवाळांकडून अखेर शब्द घेतलाच
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस अधिकारी मला धमकावतो
Bhaskar Jadhav: राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
राज्यात 'ऑपरेशन टायगर-3'च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, 'याचा अर्थ टायगर इकडे, कुत्री तिकडे'
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Embed widget