एक्स्प्लोर

19 वर्षे देशसेवा, अहिल्यानगरमधील माजी सैनिक 10 वी परीक्षा पास, मुलगाही उत्तीर्ण; निकालाचा डबल आनंद

अहिल्यानगर येथील रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या शाळेतील शिक्षक व प्राचार्य सुनील सुसरे यांच्याकडून अभिनंदन व कौतुक केलं जात आहे.

अहिल्यानगर : राज्यात दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल (SSC Results) जाहीर आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये, कोकण विभागाने 98.8 टक्के निकाल घेत राज्यात बाजी मारली. महाराष्ट्रातील एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 94.10 लागला आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील भाई सथ्था नाईट स्कूल या रात्र शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेता चांगले यश मिळवलं आहे. येथील रात्र शाळेमध्ये (School) दहावीचे शिक्षण घेणारे माजी सैनिक अंकुश पानंमद आणि वडापाव विक्रेत्या मंगल रांधवन हे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. अंकुश पानमंद यांनी 19 वर्षे देश सेवा केली असून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी त्यांनी रात्र शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि ते यावर्षी दहावी उत्तीर्ण झाले. अंकुश यांना दहावीमध्ये 60% गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा साहिल पानमंद हा देखील दहावीला होता, त्याला देखील 74 टक्के गुण मिळाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकाचवेळी बाप-लेक उत्तीर्ण झाल्याने पानमंद कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. 

अहिल्यानगर येथील रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या शाळेतील शिक्षक व प्राचार्य सुनील सुसरे यांच्याकडून अभिनंदन व कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे येथील रात्र शाळेत शिकणाऱ्या एका वडापाव विक्रेत्या महिलेनंही यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवले. तर, माजी सैनिक असलेल्या अंकशु पानमंद यांनी आपल्या मुलासह यंदा 10 वीच परीक्षा दिली होती. त्यामध्ये, बाप-लेक दोघेही एकाचवेळी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. दुसरीकडे रात्र शाळेत शिकणाऱ्या वडापाव विक्रेत्या मंगल रांधवन या देखील उत्तीर्ण झाल्या असून 1994 साली लग्न झाल्यानंतर संसाराचा गाडा हाकताना त्यांचे शिक्षण मागे पडले होते. परंतु कुठेतरी दहावी पास होण्याची आणि शिकण्याची जिद्द असल्याने 32 वर्षानंतर त्यांनी दहावीमध्ये प्रवेश घेतला आणि त्या देखील आज दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. मंगल रांधवन यां 47 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्या असून या पुढील शिक्षण देखील करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं. मंगल यांच्या या जिद्दीला आणि शैक्षणिक यशस्वीतेला कौतुकाची थाप मिळत असून स्थानिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. 

राज्यातील 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

 राज्यात 12 वीनंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) आज जाहीर झाला. राज्यात यंदा दहावीचा निकाल 94.10 % लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के असून नागपूर विभागात सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. लातूर (Latur) पॅटर्नचा यंदाही म्हणावा तेवढा निकाल दिसला नाही. कारण, राज्यातील 9 विभागांपैकी लातूर विभागाचा निकाल यंदा शेवटून दुसऱ्या क्रमांवर असून 92.77 टक्के एवढा आहे. मात्र, लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवल्याने पुन्हा एकदा लातूर पॅटर्नची चर्चा होताना दिसून येईल. राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असून लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी (Student) 100 टक्के गुण मिळवत देदीप्यमान कामगिरी बजावल्याचं दिसून येतं. दरम्यान, लातूर विभागात धाराशिव जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आह.  

हेही वाचा

दहावीच्या निकालाचा लातूर पॅटर्न; विभागात 113 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, मुलींनी मारली बाजी

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे पुत्र Parth Pawar यांच्या कंपनीवर दोन गुन्हे, मुंढवा व्यवहार रद्द
Maharashtra Politics: 'दुसऱ्याचं घर रस्त्यावर आणून किती मजा मारणार?', उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
Mumbai Rail Protest: CSMT त मोटरमनला डांबले, स्टेशन मास्तरांचीही अडवणूक; आंदोलक कर्मचारी अडचणीत
Maharashtra Politics: शरद पवार आणि भीमराव आंबेडकर एकाच मंचावर, अकोल्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
Ganpatipule : गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पोहण्याचा मोह जीवावर बेतला, एकाचा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Parth Pawar Land Scam: आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Embed widget