एक्स्प्लोर

Monsoon Care : आला पावसाळा, तब्येत सांभाळा! आल्हाददायक हवामानासोबत आरोग्याची आव्हानंही, आजारपणा नको तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Monsoon Care : मान्सूनचं आगमन झालंय.  पावसाळा म्हणजे आल्हाददायक हवामान पण आरोग्याशी संबंधित अनेक आव्हाने.. या ऋतूत आजारपणा टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या..

Monsoon Care : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय, या ऋतूसोबत विविध आजारपण देखील डोकं वर काढतात, त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहारासोबत काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. पाऊस म्हटला तर गरमीपासून सुटका तर होतेच. मात्र बरेच आजार देखील होण्याची शक्यता असते. पावसाळा म्हणजे आल्हाददायक हवामान पण आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानंही समोर येतात. या ऋतूमध्ये ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते, ते लोक सहज आजारी पडतात. त्यामुळे ऋतूमध्ये काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आजारी न पडता या ऋतूचा आनंद घेता येईल.

 

पचनाच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्याही..!

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या ऋतूमध्ये पचनाच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच, त्यांची कारणे समजून घेणे आणि प्रतिबंधासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपल्या दिनचर्येत कोणते बदल केले पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी ओन्ली हेल्थ वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता कांत यांनी याबद्दल माहिती दिलीय. त्यांनी पावसाळा ऋतूत तुम्हाला आजारपणापासून वाचवणाऱ्या मान्सून केअर टिप्स सांगितल्या आहेत.

 

सकस आणि पौष्टिक आहार घ्या

पावसाळ्यात, रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करणे चांगले. प्रथिने आणि जीवनसत्त्वे समृद्ध घरगुती जेवण खाणे चांगले. कापलेल्या फळांमध्ये असलेल्या बॅक्टेरियाचा संपर्क टाळण्यासाठी, फक्त ताज्या कापलेल्या भाज्या आणि फळे खा. गर्भधारणेच्या प्रयत्नात असाल तर, घरी अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा किंवा निरोगी पर्यायांसाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 

मांसाहार करताना..

पावसाळ्यात जर मासे आणि मांस खात असाल तर ते स्वच्छ आणि चांगले शिजवलेले असावे. जेणेकरून कमी शिजवलेल्या अन्नामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ नये. शिळं अन्न खाणे टाळावे. सर्व पोषक तत्वं पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी नेहमी ताजं तयार केलेले अन्न खा. कारण पावसातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया लवकर वाढतात आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

 

द्रव सेवन वाढवा

पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. दिवसभर भरपूर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे. तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी, ताज्या फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप, सरबत इत्यादी पर्याय निवडू शकता. साधे पाणी फक्त उकळून प्यावे. बंद पॅकेटमधील रस पिणे टाळा आणि ताजे पिळून काढलेले रस प्या.

 

हलके स्वच्छ कपडे

डॉक्टरांच्या माहितीनुसार, पावसाळ्यात हलके सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो, म्हणून हवेशीर आणि आरामदायक पोशाख निवडा.


स्वच्छता राखणे

तुमचे सर्व कपडे स्वच्छ करण्यासाठी चांगल्या दर्जाचे जंतुनाशक वापरा. शक्य असल्यास, त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी दिवसातून दोनदा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा. पाय नियमितपणे स्वच्छ करा, विशेषत: नखं, तळवे इत्यादी, कारण ते पावसाच्या घाणेरड्या पाण्यापासून जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढवू शकतात. सार्वजनिक शौचालयात वापरण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता किट सोबत ठेवणे चांगले.


घर स्वच्छ ठेवा

साचलेले पाणी हे डास, माश्या इत्यादींची पैदास करणारे ठिकाण आहे. तुमचे घर दररोज जंतुनाशकाने स्वच्छ करा आणि घाणेरडे पाणी साचू नये, म्हणून फुलांची भांडी, कोपरे, वॉशरूम स्वच्छ करा.


इनडोअर व्यायाम

जेव्हा तुम्हाला पावसामुळे वॉकिंग, जॉगिंग किंवा बाहेर व्यायाम करता येत नाही, तेव्हा तुम्ही घरातील व्यायामाचा पर्याय निवडू शकता. यामुळे सर्दी, खोकला आणि लोकांच्या संपर्कातून पसरणाऱ्या आजारांचा धोका कमी होईल. योगा, स्टेप-एरोबिक्स, झुम्बा, इ. पावसाळ्यात इनडोअर व्यायाम करण्याचा चांगला मार्ग आहे. गर्भधारणेदरम्यान कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

हेही वाचा>>>

 

Food : पावसाळ्यात तळलेल्या पदार्थांऐवजी हेल्दी खा! 'या' 3 स्नॅक्सची रेसिपी जाणून घ्या.. चवीलाही अप्रतिम..! 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget