एक्स्प्लोर

FDA च्या धाडीत आरोग्याला धोकादायक असणारा 7 टन आंब्याचा साठा जप्त; विषारी आंबा चुकून खाल्लाच तर काय होईल?

Are You Eating Safe Mangoes? आंब्याच्या हंगामात कॅल्शियम कार्बाइड वापरून आंबे शिजवले जात असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. परंतु, हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि अनेक आजारांना कारणीभूत आहेत.

Mangoes Ripened With Calcium Carbide: मुंबई : आंबा (Mango)... म्हटलं की, कदाचितच कुणी असेल, जो नको म्हणेन. अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा अगदी नकोसा करतो, पण अनेकजण फक्त आणि फक्त आंब्यासाठीच उन्हाळ्याची वाट पाहत असतात. उन्हाळ्यात बाजारात गेलं की, चोहीकडे फक्त आंबेच दिसतात. रसरशीत, पिवळ्या धम्मक आंब्याची गोड फोड जीभेवर ठेवली की, जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखं वाटतं. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? की हे हवेहवेसे वाटणारे आणि ताजे दिसणारे आंबे बनावट, विषारी असू शकतात? हादरलात ना? थांबा गोंधळू नका... सविस्तर जाणून घ्या... 

तामिळनाडूमधील अन्न सुरक्षा विभागानं एका गोदामातून, एक, दोन नव्हे तर तब्बल 7.5 टन विषारी आंबे जप्त केले आहेत. आता प्रश्न असा आहे की, हे विषारी आंबे कोणते आहेत? ते कसे बनवले जातात आणि जर हे आपण खाल्ले तर काय होऊ शकतं? 

विषारी आंबा दिसतो कसा

विषारी आंबा म्हणजे, हा आंबा प्लास्टिक किंवा मातीपासून तयार केलेला नसतो. हे झाडावरचं फळच असतं. पण कृत्रिम पद्धतीनं पिकवलेलं असतं. हे आंबे झाडावरच येतात. ते झाडावरुन तोडले जातात. पण कृत्रिम पद्धतीनं म्हणजेच, रसायनांचा वापर करुन पिकवले जातात. कृत्रिम पद्धतीनं पिकवल्यामुळे आणि घातक रसायनांचा वापर केल्यामुळे त्यांना विषारी आंबे म्हटलं जातं.

दरम्यान, आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी आहे. कॅल्शियम कार्बाइड हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. 

विषारी आंबे कसे पिकवले जातात? 

विषारी आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाइड बाजारात सहज उपलब्ध होतं. हार्डवेअरच्या दुकानातून अगदी सहज कॅल्शियम कार्बाइड खरेदी करता येतं. कॅल्शियम कार्बाइड हा एक प्रकारचा दगड आहे. अनेकजण याला चुनखडी असं देखील म्हणतात. कॅल्शियम कार्बाइडनं आंबे शिजवण्यासाठी कच्च्या आंब्यांमध्ये एका कापडात गुंडाळून ठेवलं जातं. 

कॅल्शियम कार्बाइड कापडात गुंडाळून आंब्यांभोवती ठेवल्यानंतर आंब्याची टोपली किंवा पेटी एखाद्या जाड कापडानं किंवा पोत्यानं बंद करुन ठेवली जाते. त्यानंतर तीन ते चार दिवस वारा नसलेल्या ठिकाणी ठेवतात. त्यानंतर ती पेटी उघडल्यानंतर सर्व आंबे पिकलेले असतात. असं होतं की, जेव्हा कॅल्शियम कार्बाइड आद्रतेच्या संपर्कात येतं, त्यावेळी एसिटिलीन वायू तयार होतो. ज्यामुळे फळं पिकतात. त्यामुळे झाडावर आंबे पिकण्याची वाट पाहावी लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन झटपट आंबे पिकवले जातात. आंबे पिकवण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडचा वापर मेटल कटिंग आणि स्टील उत्पादनात केला जातो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

केमिकल्सनी पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? 'हे' 5 सोपे उपाय

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShaikh Subhan Ali :  शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलनSolapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चाYugendra Pawar on Ajit Pawar : बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Embed widget