एक्स्प्लोर

Rabies : रेबीजमुळे मृत्यू होऊ शकतो का? किती धोकादायक आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणे!

गाझियाबादमध्ये कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज होऊन 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रेबीज हा आजार किती धोकादायक आहे आणि कुत्रा चावल्याने तो कसा पसरु शकतो हे जाणून घेणार आहोत.

मुंबई : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज (Rabies) आजाराने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रेबीज हा आजार किती धोकादायक आहे आणि कुत्रा चावल्याने (Dog Bite) तो कसा पसरु शकतो हे जाणून घेणार आहोत. आकडेवारीनुसार, दरवर्षी रेबीजमुळे 18 ते 20 हजार नागरिकांचा मृत्यू होतो. भारतात रेबीजची जवळपास 30 ते 60 टक्के अशी प्रकरणं आहेत, ज्यात 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना जेव्हा कुत्रा चावतो तेव्हा त्याची तक्रार केली जात नाही.

रेबीज म्हणजे काय?

रेबीज हा असा आजार आहे, जो रेबीज नावाच्या विषाणूद्वारे पसरतो. हा आजार मुख्यत्वे जनावरांमध्ये त्यातही कुत्र्यांमध्ये मोठ्या संख्येने आढळतो. जर एखाद्या प्राण्याला हा आजार झाला असेल आणि तो मनुष्याला चावला तर तो त्यांच्यातही पसरतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या जनावरांच्या लाळेत असतो. जर या आजाराने ग्रस्त असलेला जनावर मनुष्याला चावला तर हा विषाणू लाळेद्वारे मनुष्याच्या रक्तात मिसळतो.

रेबीज आजाराची मुख्य लक्षणे?

जर एखाद्या प्राण्याला रेबीजचा आजार असेल आणि त्याने एखादा प्राणी चावला असेल तर त्याची लक्षणे काही दिवसातच दिसू लागतात. दुसरीकडे, रेबीजची काही प्रकरणे अशी देखील आहेत की लक्षणे ओळखण्यास बराच वेळ लागतो. रेबीज या आजाराचे विशेष लक्षण म्हणजे जनावर चावल्यानंतर चावलेल्या भागाच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये मुंग्या येण्यास सुरुवात होते. रेबीजचा विषाणू रक्तात पोहोचतो, त्यानंतर तो मेंदूपर्यंत जातो.

रेबीज रोगाची लक्षणे

तीव्र वेदना

थकवा जाणवणे

डोकेदुखी 

ताप येणे

स्नायूंमध्ये वेदना

चिडचिड होणे

विचित्र विचार येणे

पक्षाघात

जास्त लाळ किंवा अश्रू येणे

तीव्र राग येणे

बोलताना त्रास होणे

कोणावरही हल्ला करणे

कोणत्या प्राण्यांद्वारे रेबीज पसरतो?

रेबीज हा रोज कुत्रे, मांजर आणि माकडांनी चावल्याने पसरतो. जर यापैकी कोणत्याही प्राण्याला रेबीज आजार असेल आणि तो माणसाला चावला तर त्यांनाही संसर्ग होतो.

रेबीजवर इलाज आहे का?

रेबीजवर कोणताही इलाज नसला तरी काही लोक रेबीज झाल्यानंतरही बचावले आहेत. एखाद्या व्यक्तीला रेबीजग्रस्त कुत्रा चावला असेल तर त्याला वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे.

लसीकरण

जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असेल तर वेळोवेळी त्याचे लसीकरण करणे महत्त्वाचं आहे. जेणेकरुन हा प्राणी एखाद्याला ओरबाडला किंवा चावला तरी घरात राहणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमच्या पाळीव प्राण्याचे वेळोवेळी लसीकरण होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget