एक्स्प्लोर

BLOG : मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, अपघाती मृत्यूची चिंताजनक आकडेवारी

BLOG : भारतात दर तासाला 52 अपघात म्हणजे दर मिनिटाला साधारण एक अपघात होतो. त्यात दररोज 461 म्हणजे दर तासाला साधारण 20 लोक आपला जीव गमावतात. ही आकडेवारी चिंताजनक आहे. रस्ते अपघातात जगभरात 13 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडतात. त्यातले 90 टक्क्यांपेक्षा जास्त जीव अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये जातात. भारतात दर वर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची संख्या साधारण साडेचार लाख आहे. या रस्ते अपघातात जवळपास पावणे दोन लाखांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडतात.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातील एका आकडेवारीनुसार 2022 या वर्षात देशात एकूण 4 लाख 61 हजार 312 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 1 लाख 68 हजार 491 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4 लाख 43 हजार 366 जण जखमी झाले. या अपघातांमागे अतिवेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, वाहतूकविषयक नियमांचे पालन न करणे ही महत्वाची कारणं आहेत. 

महाराष्ट्रात सुद्धा अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहे. फक्त राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा विचार केला तर देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 सालात महाराष्ट्रात 33 हजार 383 अपघात झाले, त्यात 15 हजार 224 लोक मृत्यूमुखी पडले. त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा वाटाही मोठा आहे. 

राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर 9 हजार 417 अपघात झाले त्यात 4 हजार 923 लोकांनी आपला जीव गमावला. राज्य महामार्गावरील अपघातातही महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, राज्य महामार्गावरील अपघातात 3 हजार 820 लोकांचा बळी गेला आहे. जीवघेण्या 14 हजार 58 अपघातांपैकी 10 हजार 157 अपघात ग्रामीण भागात झाले आहेत तर 3 हजार 901 अपघात शहरी भागात झाले आहेत. 

मद्याच्या धुंदीत गाडी चालवल्यामुळे 335 अपघात झालेत, त्यात 133 बळी गेले आहेत तर 269 जखमी झाले आहेत ज्यातल्या गंभीर जखमींची संख्या 172 आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रस्त्यांचं जाळं आणि सर्वाधिक 3 कोटी 77 लाख मोटर वाहनांची संख्या आहे. त्या तुलनेत अपघात आणि बळींची संख्या कमी वाटत असली तरी तो फक्त स्टॅटिस्टिक्सचा मुद्दा आणि त्यातून आपलं समाधान करुन घेण्याचा प्रयत्न असू शकतो. प्रत्यक्षात एकही माणूस रस्ते अपघातात जखमी होणं किंवा जीवानिशी जाणं हा त्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी मोठा आघातच असतो. त्यांचं होणारं नुकसान कोणत्याच आकड्यात लपणं शक्य नसतं.

पुणे कल्याणीनगर पोर्शा कारचा अपघात भीषणच आहे. पण याची जास्त चर्चा झाली कारण त्यात अनेक गोष्टी अशा घडल्या ज्याने सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. दोन सव्वा दोन कोटींची पोर्शा गाडी... धनाढ्य बिल्डरचा अल्पवयीन मुलगा.. मद्याच्या अमलाखाली त्याने बेदरकार कार चालवणं आणि दोन निष्पाप जीवांचं चिरडलं जाणं. त्यानंतर सरकारमधील एका पक्षाच्या आमदाराने स्वत: मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाणं... त्यात पोलिसांनी प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलंय असं न वाटणं... रुग्णालयातही निकष कठोरपणे पाळले गेले नाहीत असे आरोप होणं.. न्यायालयाने या मुलाला तात्काळ सोडणं आणि हाईट म्हणजे त्याला दिलेल्या शिक्षेत त्याला 300 शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा देणं... या सगळ्या गोष्टींमुळे हा अपघात राज्यभर-देशभर चर्चेत राहिला. यात राजकारण आल्यामुळे याची गंभीर दखल घेतली गेली. हे नसतं झालं तर कोणी सांगावे हा अपघात देशात वर्षाला घडणाऱ्या इतर 4 लाख अपघातांपैकी एक बनून गेला असता.

नशीब काही लोकांनी व्हिडीओ काढले आणि त्यामुळे निदान काही न नाकारता येणारे पुरावे तरी हाती आले. आपली सिस्टम प्रत्येक लेव्हलला किती कॉम्प्रमाईज होऊ शकते याची जाणीव या अपघाताने आणि अपघातानंतरच्या घटनाक्रमांनी पुन्हा झाली. 

असे प्रकार  टाळता येणं शक्य आहे आणि त्यासाठी बस एक बंदा काफी असतो हे आपण याआधी पाहिलंय. कुणीतरी कुठेतरी पाठीचा कणा दाखवतं आणि अन्यायाला वाचा फुटते. इथेही ते होईल आणि पुणे अपघातात जीव गमावलेल्या त्या दोन निष्पाप जीवांना, त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल अशी आशा करुयात.

 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
आधीच भारतावर 50 टक्के कर लादला अन् आता 'इराणविरोधात व्यापार केल्यास...' ट्रम्प यांचा नवा फतवा तत्काळ लागू, भारताचा इराणसोबत किती अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार?
आधीच भारतावर 50 टक्के कर लादला अन् आता 'इराणविरोधात व्यापार केल्यास...' ट्रम्प यांचा नवा फतवा तत्काळ लागू, भारताचा इराणसोबत किती अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार?
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
जिथं जिथं निवडणुका तिथं तिथं ईडी फाईल उघडली, पश्चिम बंगालपूर्वी 3 राज्यांमध्ये सेम पॅटर्न; महाराष्ट्र, दिल्ली झारखंडनंतर तामिळनाडू, आसाम, केरळ, पुद्दुचेरीत छापेमारी
आधीच भारतावर 50 टक्के कर लादला अन् आता 'इराणविरोधात व्यापार केल्यास...' ट्रम्प यांचा नवा फतवा तत्काळ लागू, भारताचा इराणसोबत किती अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार?
आधीच भारतावर 50 टक्के कर लादला अन् आता 'इराणविरोधात व्यापार केल्यास...' ट्रम्प यांचा नवा फतवा तत्काळ लागू, भारताचा इराणसोबत किती अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार?
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Santosh Dhuri and Sandeep Deshpande: राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला म्हणणारे भाजपवासी संतोष धुरी अन् संदीप देशपांडे एकत्र आले, मित्राच्या बर्थडेला शेजारी उभे राहून टाळ्या वाजवल्या
राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला म्हणणारे संतोष धुरी अन् संदीप देशपांडे एकत्र आले, मित्राच्या बर्थडेला शेजारी उभे राहून टाळ्या वाजवल्या
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Embed widget