Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Astrological Tips : पैशाची तंगी असेल किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख-समृद्धीची कामना करण्यासाठी काही सोप्या उपायांनी तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करु शकता.
Astrological Tips : भारतात अनेक रुढी-परंपरा आहेत. यासोबत श्रद्धेलाही महत्त्व आहे. भारतात अनेक धार्मिक श्रद्धा पाळल्या जातात. त्यांना अत्यंत महत्त्व दिलं जातं. अनेक लोक वैदिक शास्त्रावर विश्वास ठेवतात. ज्योतिषशास्त्राचा रोजच्या जीवनात वापर केल्यास चांगले आरोग्य, सुख-समृद्धी वाढते, संपत्ती आणि नातेसंबंध वृद्धींगत होतात आणि करिअरसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होतात, असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, काही गोष्टी केल्याने तुम्हाला आयुष्यात, यश पैसा आणि प्रसिद्धी मिळविण्यास मदत होऊ शकते. दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा अवलंब केल्याने तुमचं भाग्य उजळतं असं मानलं जातं. अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्यास तुमच्या मनाप्रमाणे यश मिळून ध्येय साध्य होण्यास मदत होते, असं सांगितलं जातं.
पाण्यात या पाच वस्तू मिसळून अंघोळ करा
पाण्यासंबंधित हे उपाय तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्याही दूर करण्यास मदत करतात. या काही छोट्या-छोट्या उपायांनी तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता आणि तुमच्या आयुष्यातील अशुभ समय दूर करू शकता, असं सांगितलं जातं. दररोज अंघोळीच्या पाण्यात वेगवेगळ्या गोष्टी टाकून तुम्ही तुमचं भाग्य उजळू शकता. अंघोळीच्या पाण्यात आणि कोणत्या दिवशी, कोणत्या वस्तू टाकाव्यात, हे जाणून घ्या.
अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाका ( Put These 5 things in Bathing Water )
मीठ
आठवड्यातून दोन दिवस आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका. मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हे अतिशय शुभ दिवस आहेत. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. मीठ नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते.
दूध
सोमवारी आंघोळीच्या पाण्यात दूध टाकल्याने मानसिक शांती मिळते. हे करणे खूप शुभ मानलं जातं.
हळद
गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने गुरू ग्रह मजबूत होतो, असं सांगितलं जातं. यामुळे तुमच्या त्वचेवरही तेज येते. तसेच हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने संपत्ती वाढते, असं मानलं जातं.
परफ्यूम
शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात सुगंधी द्रव्य टाकून आंघोळ केल्याने तुमच्याकडील आकर्षण वाढते. दर शुक्रवारी असे केल्यास याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
गुलाबजल
याशिवाय, शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकल्याने शरीर मजबूत होते. तसेच, गुलाब पाण्याने अंघोळ केल्याने जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुखसुविधा मिळतात.
या सर्व 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात किंवा स्वयंपाकघरात नेहमी सहज सापडतील. पण, जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाकून आंघोळ केली तर या चमत्कारिक उपायांमुळे तुमचं जीवन सुख-समृद्धी मिळून संपत्तीत भरभराट होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)