एक्स्प्लोर

रिव्ह्यू: पुष्पक विमान- लेट झालेलं विमान

पुष्पक विमान या सिनेमाची गोष्ट तशी लहान आहे. पण सिनेमा करताना त्यातली पटकथा मोठी केल्यामुळे हा सिनेमा कमालीचा लांबतो.

गेल्या काही दिवसांपासून पुष्पक विमान या सिनेमाची चर्चा आहे. एकतर सुबोध भावे आणि मोहन जोशी असे दोन गुणी अभिनेते बऱ्याच दिवसांनी एका सिनेमात दिसतायत ही एक बाजू. आणि लेखनाचं अंग असलेल्या वैभव चिंचाळकर यांनी या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केल्याने, आता त्यांच्या कामगिरीकडे असलेलं लक्ष हे त्याचं दुसरं कारण. या सिनेमाची गोष्ट तशी लहान आहे. पण सिनेमा करताना त्यातली पटकथा मोठी केल्यामुळे हा सिनेमा कमालीचा लांबतो. त्यामुळे तो कंटाळवाणा होतो. तात्या जळगावला राहतात. गावात कीर्तनकार म्हणून त्यांचा लौकीक. कीर्तनातून तुकारामाची गोष्ट सांगता सांगता त्यांना तुकोबांना न्यायला आलेल्या पुष्पक विमानाचं भारी अप्रूप आहे. त्यांचा एकुलता एक नातू विलास मुंबईला असतो. त्याचं लग्न झालंय. पण बरीच वर्षं तो जळगावला आलेला नाही. तो तात्यांना सतत मुंबईला बोलावतोय. पण तात्या तिकडे जायला काही तयार नाहीत. एक दिवस काही कारणाने तात्या पडतात आणि विलास जळगावला येतो. त्यांच्याशी बोलून विलास त्यांना मुंबईला आणतो. गावात ऐसपैस राहिलेल्या तात्यांना मुंबई अडचणीची वाटू लागते. तरी कसेबसे काही दिवस काढून तात्या जळगावला जायचा हट्ट धरतात. अन त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरून विमान उडतं. त्याला पाहून तात्या विस्मयचकीत होतात. विलास त्यांना या विमानात बसवायचं मान्य करतो आणि आपण पुष्पकमध्ये बसणार याची कल्पना तात्यांनी सुखावते. मग हा प्रवास नेमका कसा घडतो त्याची ही गोष्ट. सिनेमातले संवाद मनात घर करतात. उदाहरण द्यायचं तर ट्रेलरमध्ये असलेल्या आजोबा नातवाच्या नात्याचं देता येईल. आजोबासाठी नातू म्हणजे आयुष्याचा शेवट. तर नातवासाठी आजोबा म्हणजे सुरूवात, हा संवाद कमाल आहे. आयुष्य वाढतं तसं आत्मा स्वाभिमानी होतो आणि शरीर परावलंबी हा संवादही महत्वाचा. विमानाला पाहून तात्यांचा हा कुठला पक्षी असं विचारणंही कन्व्हिंन्सिंग पाटत नाही. यातले संवाद सोपे सहज असले तरी पटकथा लिहिताना मात्र ती लांबली आहे. पहिल्या भागात व्यक्तिरेखा उभ्या राहतात. पण त्या पलिकडे इथे फार काही घडत नाही. तर दुसऱ्या भागात गाणी जरा जास्त झाली आहेत. त्यातलं शौनक अभिषेकी आणि जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेलं गाणं सुरेख जमून आलंय. पण त्यातलं मुंबईचं गाणं मात्र ऐकायला बरं वाटतं. पण त्याचं चित्रिकरण रूचत नाही. गाण्यात सतत आजुबाजूच्यांना नाचवणं रम्य वाटत नाही. शिवाय, तात्यांना असलेला मामुला आजार विलास त्यांना का सांगत नाही तेही कळत नाही. त्यामुळे पुढे घडणाऱ्या मेलोड्रामावर प्रश्न निर्माण होतो. तसाच शेवटही घाईघाईचा झालेला. या सिनेमातले अनेक प्रसंग आपण यापूर्वी इतर सिनेमात पाहिलेत असं वाटून जातं. विशेषत: विलास आणि फिरोज यांच्यातले संवाद. या प्रकारामुळे सिनेमा कमालीचा लांबला आहे. दोन तासांचा हा सिनेमा साधारण ९० मिनिंटांत संपवला असता तर धमाल आली असती  असं वाटून जातं. एक नक्की यात कमाल केली आहे ती मोहन जोशी यांनी. त्यांचा तात्या अफलातून आहे. त्यांच्यामुळे यातले संवाद आणखी जिवंत होतात आणि सिनेमा खिळवून ठेवतो. अतिशय सहज अभिनय ही त्यांची जमेची बाजू. गावात असताना त्यांचं विसराळू असणं.. विलाससाठी केलेला आटापिटा कमाल आहे. त्यावेळी मुंबईत आल्यानंतर डोळे दिपवून टाकणारे अनुभव दाखवणंही तितकंच कमाल. सुबोधनेही आपल्या भूमिकेची मर्यादा ओळखून काम केल आहे. राहुल देशपांडे यांची भूमिका छोटी असली तरी तिथे चांगला अभिनेता  हवा होता का असं वाटून जातं. गौरी किरण ही नवी नायिका पडद्यावर पदार्पण करते आहे. तिची भूमिका छोटी असली तरी तिने ती नेटकी वठवली आहे. एकूणात, हा सिनेमा लांबल्यामुळे काहीसा कंटाळवाणा होऊ लागतो. तो जरा कसून बांधला असता तर धमाल आली असती हे नक्की. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत दोन स्टार. पण.. मोहन जोशी यांच्या अभिनयाने यावर अर्धा स्टार मिळवला आहे. म्हणूनच सिनेमाला एकूणात मिळतात अडीच स्टार. 

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget