![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aamir Khan Movie : लोकांनी डोक्यावर उचलला पण किरणला नाही भावला आमिरचा 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केलेली कोट्यवधींची कमाई
Aamir Khan : आमिर खानच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. पण किरण रावला (Kiran Rao) मात्र हा सिनेमा पसंतीस उतरला नाही.
![Aamir Khan Movie : लोकांनी डोक्यावर उचलला पण किरणला नाही भावला आमिरचा 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केलेली कोट्यवधींची कमाई Aamir Khan Movie lapaata ladies director Kiran Rao did not liked Aamir Khan blockbuster film Ghajini loved Laal Singh Chaddha Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Aamir Khan Movie : लोकांनी डोक्यावर उचलला पण किरणला नाही भावला आमिरचा 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केलेली कोट्यवधींची कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/42b70e47545b058bcfd9874deb04369c1708440432535254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aamir Khan Movie : सिने-दिग्दर्शक, निर्माती किरण राव (Kiran Rao) सध्या चर्चेत आहे. किरणचा 'लापता लेडीज' हा सिनेमा 1 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. प्रमोशनदरम्यान आमिर खानचा (Aamir Khan) ब्लॉकबस्टर सिनेमा पसंतीस न उतरला असल्याचं किरण रावने सांगितलं आहे.
'लापता लेडीज' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान किरण रावला विचारण्यात आले की आमिर खानचे कोणते ब्लॉकबस्टर सिनेमे पसंतीस उतरले आहेत. त्यावेळी लाईव्ह हिंदुस्तानसोबत बोलताना किरण राव म्हणाली,"आमिरचे अनेक सुपरहिट सिनेमे माझ्या पसंतीस उतरले. पण त्याचा 'गजनी' (Ghajini) हा सिनेमा मला आवडला नाही". 'गजनी' या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 114 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या सिनेमाने 194.10 कोटींचा गल्ला जमवला होता.
आमिरचा फ्लॉप झालेला कोणता सिनेमा किरणला आवडला?
आमिरच्या फ्लॉप सिनेमाबद्दल बोलताना किरण राव म्हणाली,"लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या सिनेमात मला अनेक चुकादेखील दिसल्या. पण तरीदेखील मला हा सिनेमा खूप आवडला आहे". आमिर खान आणि किरण राव हे दोघे नुकतेच आयरा खानच्या लग्नसोहळ्यात एकत्र दिसले होते.
आमिर-किरण काय म्हणालेले?
आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये ते म्हणाले होते की,"15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं."
निवेदनात ते पुढे म्हणालेले,"एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचे आम्ही आभार मानतो, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो". किरण आणि आमिरच्या आगामी कलाकृतींची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Aamir Khan-Kiran Rao Divorce : 15 वर्षाच्या सुखी संसारानंतर आमीर खान आणि किरण राव यांचा वेगळं होण्याचा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)