एक्स्प्लोर

Cirkus Movie Review : ...यापेक्षा जत्रेतील सर्कस बरी; वाचा 'सर्कस' चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू

Cirkus Movie Review : सर्कस चित्रपटाची कथा रॉय आणि जॉय नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारी आहे.

Cirkus Movie Review : रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा मसाला मनोरंजनात्मक चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या गोलमाल या चित्रपटाला प्रेक्षकांची विषेश लोकप्रियता मिळाली. त्याचे चित्रपट फक्त टाईमपास म्हणून नसतात तर त्यातून चांगलं मनोरंजन देखील होतं. मात्र, सर्कस (Cirkus) हा रोहित शेट्टीचा चित्रपट याला अपवाद आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीचा सर्वात बोरिंग चित्रपट आहे. या चित्रपटात कोणताही मसाला नाही. मनोरंजन नाही. 

चित्रपटाचे कथानक 

सर्कस चित्रपटाची कथा रॉय आणि रॉय यांची आहे. हे जुळे असतात. तसेच जॉय नावाची देखील जुळे व्यक्ती आहेत. या चार मुलांना अनेक अनाथ आश्रमात सोडण्यात येते. अनाथ आश्रमाचे केअर टेकर डॉ. मुरली शर्मा हे या मुलांना दोन वेगवेगळ्या कुटुंबात दत्तक देतात. म्हणजेच एक जॉय आणि रॉय एका कुटुंबात आणि एक जॉय आणि रॉय दुसऱ्या कुटुंबात. त्यानंतर जेव्हा ही मुलं मोठी होतात. तेव्हा खरा गोंधळ सुरु होतो. चित्रपटात पुढे काय होतं हे जर तुम्ही हा रिव्ह्यू वाचल्यानंतरही चित्रपट पाहायला गेलात तर तुम्हाला कळेल.     

या चित्रपटात एक रॉय म्हणजेच रणवीर सिंहला विजेचा झटका बसत नाही तर दुसऱ्याला विजेचा झटका बसतो. आणि प्रेक्षकांनाही हा चित्रपट पाहून एक झटकाच बसतो. चित्रपटाचे लेखन फारच वाईट आहे. संवादांमध्ये अजिबात दम नाही. एक-दोन सीन असतील जिथे तुम्हाला थोडं हसू येईल. हसणे तर सोडाच हा चित्रपट बघून तो रोहित शेट्टीचा चित्रपट आहे असे वाटतच नाही. रोहित शेट्टीने हा चित्रपट बनवला हे शेवटपर्यंत कळत नाही. असं वाटतं की हा चित्रपट बनवताना रोहित शेट्टीने पाहिलाच नाही. जर पाहिला असता तर कदाचित त्यामध्ये काही सुधारणा केल्या असत्या.

अभिनय 

रणवीर सिंह हा एक अप्रतिम अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने एकापेक्षा एक सर्रास व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण इथे त्याच्या अभिनयात कोणतीही ताकद दिसत नाही. चित्रपट पाहाताना रणवीरची स्टाईल, त्याचं अस्तित्वच दिसत नाही. वरूण शर्माने फुकरे चित्रपटात  अप्रतिम काम केलं आहे. पण इथे तो एकदम वाईट अभिनय करताना दिसतोय. त्याला बघून एकदाही हसू येत नाही. पूजा हेगडेचं काम छान आहे. पण तिच्या भूमिकेतही फारसं खास काही नव्हतं. जॅकलीनने तेच केलं आहे जे काम ती आतापर्यंत करत आली आहे. तिच्या अभिनयात कोणतीही ताकद दिसून येत नाही. संजय मिश्रा यांच्या कॉमिक टायमिंगने आपल्याला नेहमीच हसू येतं. सिद्धार्थ जाधवने चांगलं काम केलं आहे. याशिवाय जॉनी लिव्हर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, ब्रजेश हिरजी, मुकेश तिवारी असे अनेक कलाकार चित्रपटात आहेत. पण यापैकी एकाही कलाकाराने यया चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडलेली नाही. कोणत्याच कलाकाराचा योग्यरित्या वापर करण्यात आला नाही. 

दिग्दर्शन 

रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात यावेळी काहीच ताकद दिसून आली नाही. चित्रपटाची कथा ही 60 ते 70 च्या दशकातील आहे. मात्र, चित्रपट पाहताना असे कुठेच जाणवत नाही. बेंगळुरू आणि उटी कुठेही नीट दाखविण्यात आलेले नाहीत. सेट पूर्णपणे बनावट वाटतायत. कलाकारांची एवढी मोठी गर्दी का जमली हे समजण्यापलीकडचे आहे. ते पाहता रोहित शेट्टीने स्वतः दिग्दर्शन केले असेल असे वाटत नाही.

चित्रपटाच्या संगीतातही फारशी ताकद दिसून येत नाही. सध्याचं 'करंट लगा' गाणं सोडलं तर कोणतंही गाणं लक्षात राहत नाही.  

महत्त्वाच्या बातम्या : 

Abhishek Bachchan: 'अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांइतका टॅलेंटेड नाही' तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट; अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget