एक्स्प्लोर

UP Election 2022: दुसऱ्या टप्प्यातील मतदान होताच अखिलेश यांचा 100 जागा जिंकल्याचा दावा....

यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्यात काल मतदान झाले. त्यानंतर या जागांवर विजयाबाबत सर्वच नेत्यांनी दावे केले आहेत. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दोन्ही टप्प्यात जनतेचा पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा केलाय.

Yogi Adityanath UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर आता या जागांवर विजयाबाबत सर्वच नेत्यांनी आपापले दावे केले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दोन्ही टप्प्यात जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षेचा उल्लेख करून जनतेचे आभार मानले आहेत. दरम्यान, दोन्ही टप्प्यात समाजवादी पार्टीने जागा दिंकण्याचे शतक पूर्ण केल्याचा दावा देखील अखिलेश यांनी केला आहे.  

दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच अखिलेश यादव यांनी ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जनतेचा पाठिंबा पाहता सपा आघाडीने जागा जिंकण्याचे शतक पूर्ण केल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले.  दोन्ही टप्प्यात मिळालेल्या जनतेच्या 100 टक्के पाठिंब्याबद्दल त्यांनी जनेतेचे आभार मानत जनता भाजपला परत जा, असे सांगत असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
 
दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनीही ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, लोकशाहीच्या महायज्ञात सर्वांनी मतदानाा हक्क बजावल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानलेत. निवडणुकीतील तुमचा उत्साह तुमची जागरूकता दर्शवत आहे. तुमचे मत उत्तर प्रदेशातील सुरक्षेसाठी आणि समृद्धीच्या प्रवासाला नवी गती देईल असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान लोकांचा दृष्टिकोन संमिश्र होता. मतदानासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले नाहीत, मात्र, सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी 60 टक्क्यांच्या पुढे गेली. यूपीमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान झाले आहे. अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने मतदानाची अंतीम आकडेवारी जाहीर केलेली नाही. या टप्प्यात मतदानाची टक्केवारी 64 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागांसाठी मतदान झाले. तिन्ही राज्यात मिळून आज एकूण 165 जागांसाठी मतदान झाले. यासाठी 1 हजार 519 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यूपीमधील 55 विधानसभा जागांसाठी 586 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते तर उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 632 आणि गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात होते. 
 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
West Bengal Elections : बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget