एक्स्प्लोर

'तुम्ही मतांचं जुगाड करून जिंकलात, जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश!' : शिवसेना

Shiv Sena On Rajya Sabha Election Result : राज्यसभेच्या एका जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं आता भाजपवर सामनाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Shiv Sena On Rajya Sabha Election Result : राज्यसभेच्या एका जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं आता भाजपवर सामनाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.   राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल आणि ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत, असं सामनामध्ये म्हटलं आहे. 

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, तुम्ही मतांचं जुगाड करून जिंकलात, जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश आले म्हणून जगबुडी तर झाली नाही ना? राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे, असं लेखात म्हटलं आहे.  केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जावा हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकून दाखवली याबद्दल त्यांचे अभिनंदन, असं लेखामध्ये म्हटलं आहे. 

अग्रलेखात म्हटलं आहे की,  राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीनेच सहावी जागा जिंकावी ही योजना जशी महाविकास आघाडीची होती तशीच भारतीय जनता पक्षाची होती. राजकारणात हे व्हायचेच. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्यांचे गणित भाजपच्या बाजूने गेले आणि त्यांचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले. अर्थात जो जिता वोही सिकंदर या न्यायाने सिकंदरांचा जल्लोष आणि उत्सव सुरू आहे. जणू काही फार मोठा चमत्कारच घडवला आहे, अशा पद्धतीचे अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत, असं लेखात म्हटलं आहे. 

लेखामध्ये सांगितलं आहे की, एक साधा विषय समजून घेतला पाहिजे, महाविकास आघाडीकडे सत्तास्थापनेच्या वेळी 170 आमदारांचे बळ होते. विधानसभा अध्यक्षांना थेट मतदानात भाग घेता येत नसल्याने हा आकडा 169 वर येतो. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने 161 आमदारांनी मतदान केले. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि ज्यांचे मत 'बाद' करायला लावले ते सुहास कांदे पकडले तर आकडा होतोय 164. शिवसेनेचे एक आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. पंढरपूरची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गमावली. हा सर्व हिशेब केला तर आजही आमदारांची संख्या 166 इतकी आहे. म्हणजे विश्वासदर्शक ठरावापेक्षा संख्या 3 नेच कमी आहे. या तीन मतांपैकी अपक्षांची दोन मते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाविकास आघाडीबरोबर नव्हती.  त्यामुळे सहाव्या जागेच्या विजयाने महाराष्ट्रात मुंगीने मेरू पर्वत गिळला हो, अशी जी हाकाटी सुरू आहे त्यात दम नाही, असं लेखात म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाचे 'स्वतंत्र' आणि 'निष्पक्ष' वर्तन मानायचे काय? 

अग्रलेखात पुढं म्हटलं आहे की, शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. हे एक गौडबंगालच आहे, पण त्याच पद्धतीचा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदान प्रक्रियेवर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे आमच्या निवडणूक आयोगाचे 'स्वतंत्र' आणि 'निष्पक्ष' वर्तन मानायचे काय? खरे तर राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेतील सर्व आक्षेप फेटाळले. हा त्यांचा अधिकार असतानाही त्या अधिकारावर दिल्लीतून अतिक्रमण झाले. विधिमंडळातील कोणत्या चेंबर्समधून दिल्लीत हॉटलाइन सुरू होत्या आणि त्याबरहुकूम काय घडविण्यात आले त्याचा स्फोट झाला तर देशातील लोकशाही व निवडणूक पद्धतीचा मुखवटा जगासमोर गळून पडेल. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया तांत्रिक आणि किचकट आहे हे खरे असले तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची मते पक्की राहिली. त्यामुळे या सहाव्या जागेच्या निमित्ताने कुणी शहाणे राज्यातील सरकार अस्थिर होण्याची स्वप्ने पाहत असतील तर ते मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे व भक्कम राहील, असंही लेखात म्हटलं आहे.

 विजयासाठी फडणवीस यांचे चातुर्य आणि सूक्ष्म नियोजन कामी आले 

अग्रलेखात म्हटलं आहे की,  सहाव्या जागेच्या विजयासाठी फडणवीस यांचे चातुर्य आणि सूक्ष्म नियोजन कामी आले ते खरे असेलही. त्यांनी ज्या पद्धतीने मतांचे नियोजन केले त्यामुळे दुसऱ्या फेरीत सहाव्या उमेदवाराची मतसंख्या वाढली हे खरे असले तरी यात राजकीय भाग्याचेही महत्त्व आहे. पहिल्या पसंतीची 33 मते शिवसेना उमेदवार संजय पवारांना तर 27 मते धनंजय महाडिकांना होती. तरीही पवार हरले. अशी गणिते इतर राज्यांतही मांडण्यात आली. हरयाणातही महाराष्ट्राप्रमाणे खेळ झाल्याने काँग्रेसचे अजय माकन हे 'पाव' मताने हरले. त्यांचा पराभवही संशयाच्या भोवऱ्यात आहे. माकन यांना तर आधी विजयी घोषित केले होते. राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल व ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत. अशा निवडणुकांत 'आमदार'रूपी माणसे गोळा करणे, त्यांना सांभाळणे, टिकवणे हे लोकशाही पद्धतीत दिव्य होऊन बसले आहे. ज्यांच्या हाती ससा तो पारधी असा प्रकार त्यातूनच होतो, असं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget