एक्स्प्लोर

'तुम्ही मतांचं जुगाड करून जिंकलात, जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश!' : शिवसेना

Shiv Sena On Rajya Sabha Election Result : राज्यसभेच्या एका जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं आता भाजपवर सामनाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Shiv Sena On Rajya Sabha Election Result : राज्यसभेच्या एका जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं आता भाजपवर सामनाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला आहे.   राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल आणि ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत, असं सामनामध्ये म्हटलं आहे. 

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, तुम्ही मतांचं जुगाड करून जिंकलात, जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश आले म्हणून जगबुडी तर झाली नाही ना? राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे, असं लेखात म्हटलं आहे.  केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जावा हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकून दाखवली याबद्दल त्यांचे अभिनंदन, असं लेखामध्ये म्हटलं आहे. 

अग्रलेखात म्हटलं आहे की,  राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीनेच सहावी जागा जिंकावी ही योजना जशी महाविकास आघाडीची होती तशीच भारतीय जनता पक्षाची होती. राजकारणात हे व्हायचेच. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्यांचे गणित भाजपच्या बाजूने गेले आणि त्यांचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले. अर्थात जो जिता वोही सिकंदर या न्यायाने सिकंदरांचा जल्लोष आणि उत्सव सुरू आहे. जणू काही फार मोठा चमत्कारच घडवला आहे, अशा पद्धतीचे अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत, असं लेखात म्हटलं आहे. 

लेखामध्ये सांगितलं आहे की, एक साधा विषय समजून घेतला पाहिजे, महाविकास आघाडीकडे सत्तास्थापनेच्या वेळी 170 आमदारांचे बळ होते. विधानसभा अध्यक्षांना थेट मतदानात भाग घेता येत नसल्याने हा आकडा 169 वर येतो. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने 161 आमदारांनी मतदान केले. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि ज्यांचे मत 'बाद' करायला लावले ते सुहास कांदे पकडले तर आकडा होतोय 164. शिवसेनेचे एक आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. पंढरपूरची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गमावली. हा सर्व हिशेब केला तर आजही आमदारांची संख्या 166 इतकी आहे. म्हणजे विश्वासदर्शक ठरावापेक्षा संख्या 3 नेच कमी आहे. या तीन मतांपैकी अपक्षांची दोन मते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाविकास आघाडीबरोबर नव्हती.  त्यामुळे सहाव्या जागेच्या विजयाने महाराष्ट्रात मुंगीने मेरू पर्वत गिळला हो, अशी जी हाकाटी सुरू आहे त्यात दम नाही, असं लेखात म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाचे 'स्वतंत्र' आणि 'निष्पक्ष' वर्तन मानायचे काय? 

अग्रलेखात पुढं म्हटलं आहे की, शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. हे एक गौडबंगालच आहे, पण त्याच पद्धतीचा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदान प्रक्रियेवर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे आमच्या निवडणूक आयोगाचे 'स्वतंत्र' आणि 'निष्पक्ष' वर्तन मानायचे काय? खरे तर राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेतील सर्व आक्षेप फेटाळले. हा त्यांचा अधिकार असतानाही त्या अधिकारावर दिल्लीतून अतिक्रमण झाले. विधिमंडळातील कोणत्या चेंबर्समधून दिल्लीत हॉटलाइन सुरू होत्या आणि त्याबरहुकूम काय घडविण्यात आले त्याचा स्फोट झाला तर देशातील लोकशाही व निवडणूक पद्धतीचा मुखवटा जगासमोर गळून पडेल. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया तांत्रिक आणि किचकट आहे हे खरे असले तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची मते पक्की राहिली. त्यामुळे या सहाव्या जागेच्या निमित्ताने कुणी शहाणे राज्यातील सरकार अस्थिर होण्याची स्वप्ने पाहत असतील तर ते मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे व भक्कम राहील, असंही लेखात म्हटलं आहे.

 विजयासाठी फडणवीस यांचे चातुर्य आणि सूक्ष्म नियोजन कामी आले 

अग्रलेखात म्हटलं आहे की,  सहाव्या जागेच्या विजयासाठी फडणवीस यांचे चातुर्य आणि सूक्ष्म नियोजन कामी आले ते खरे असेलही. त्यांनी ज्या पद्धतीने मतांचे नियोजन केले त्यामुळे दुसऱ्या फेरीत सहाव्या उमेदवाराची मतसंख्या वाढली हे खरे असले तरी यात राजकीय भाग्याचेही महत्त्व आहे. पहिल्या पसंतीची 33 मते शिवसेना उमेदवार संजय पवारांना तर 27 मते धनंजय महाडिकांना होती. तरीही पवार हरले. अशी गणिते इतर राज्यांतही मांडण्यात आली. हरयाणातही महाराष्ट्राप्रमाणे खेळ झाल्याने काँग्रेसचे अजय माकन हे 'पाव' मताने हरले. त्यांचा पराभवही संशयाच्या भोवऱ्यात आहे. माकन यांना तर आधी विजयी घोषित केले होते. राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच. आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल व ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत. अशा निवडणुकांत 'आमदार'रूपी माणसे गोळा करणे, त्यांना सांभाळणे, टिकवणे हे लोकशाही पद्धतीत दिव्य होऊन बसले आहे. ज्यांच्या हाती ससा तो पारधी असा प्रकार त्यातूनच होतो, असं ते म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Full PC : घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाहीत; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोलाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP MajhaSharad Pawar Full Speech : लोकांना नको असताना निवडणूक आयोगाचा EVMसाठी हट्ट का ?Jayant Patil Markadwadi Speech : उत्तम जानकरांचा राजीनाम्याचा शब्द, जयंत पाटील म्हणतात..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
Sharad Pawar : फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
Embed widget