एक्स्प्लोर

बारामतीत सुप्रिया सुळे जिंकूनही शरद पवारांचा ईव्हीएमवर अविश्वास कायम

वंचित बहुजन आघाडीच्या मताच्या गणिताबद्दल आम्ही अजून अभ्यास केलेला नाही. मात्र सध्या तरी तीन चार जागा वगळता काही विशेष प्रभाव नाही. वंचितचा काही मतदारसंघात फटका बसणार आहे. मात्र आम्ही याचा गांभीर्याने विचार करणार आहोत, असेही पवार म्हणाले.

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यानंतरही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ईव्हीएमवर अविश्वास कायम आहे. निकालाचे बहुतांश कल हाती आल्यानंतर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. पवार यावेळी म्हणाले की, आता जो निर्णय लोकांनी दिला आहे तो स्वीकारला पाहिजे. मात्र मात्र लोकांच्या मनात ईव्हीएमवर शंका कायम आहे. अशी शंका याआधी कधीही घेतली नव्हती. मोठ्या प्रमाणात याआधी काँग्रेसने देखील विक्रमी जागा जिंकल्या मात्र कधी कुणी निवडणूक यंत्रणा आणि प्रक्रियेवर शंका घेतली नाही. मात्र आता घेतली जातेय, असे पवार म्हणाले. दरम्यान आता सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून भाजपच्या कांचन कुल यांचा लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. शरद पवार यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना जर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे हरल्या तर माझा लोकशाहीवरील विश्वास उडून जाईल. तसेच ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितलं. मी घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं आहे, असंही पवार म्हणाले होते. पवार यावेळी म्हणाले की, मोठ्या प्रमाणात याआधी काँग्रेसने देखील विक्रमी जागा जिंकल्या मात्र कधी कुणी निवडणूक यंत्रणा आणि प्रक्रियेवर शंका घेतली नाही. अगदी विरोधी पक्षांनी देखील घेतली नव्हती. मात्र यावेळी निवडणूक आयोग आणि देशाच्या नेतृत्वाविरोधात संशयाचं भूत देशात निर्माण झालं होतं, जे आधी कधी झालं नव्हतं. मात्र आता देशाच्या लोकांचा हा निर्णय मान्य आहे, असे पवार म्हणाले.
पवार यावेळी म्हणाले की, मी माढा मतदारसंघातून लढणार नव्हतोच. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं. माढ्यात आमच्या सहकाऱ्यामध्ये संघर्ष होता, म्हणून मी कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या होत्या, असे ते म्हणाले.मावळमध्ये पार्थची जागा न येणारी होती. न निवडून येणारी जागा जिंकण्यासाठी आम्ही पार्थला उमेदवारी दिली. मात्र तिथे आम्ही खूप चांगला बेस बनवला आहे, असे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या मताच्या गणिताबद्दल आम्ही अजून अभ्यास केलेला नाही. मात्र सध्या तरी तीन चार जागा वगळता काही विशेष प्रभाव नाही. वंचितचा काही मतदारसंघात फटका बसणार आहे. मात्र आम्ही याचा गांभीर्याने विचार करणार आहोत, असेही पवार म्हणाले. ही निवडणूक देशाची होती, लोकांनी मोदींकडे पाहून मतदान केलं. मात्र विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगळी असते. मुद्दे वेगळे असतात. मोदींना एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटत नव्हतं, असे पवार म्हणाले. या निवडणुकीत राज ठाकरेंचे उमेदवार नव्हते, त्यांचे उमेदवार असते तर चित्र वेगळं असतं. त्यांची भूमिका मांडली, असे पवार म्हणाले. बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या अनेक लोकांनी बारामतीत मुक्काम केला. मात्र काही फरक पडला नाही. त्यांना या निकालातून उत्तर मिळालं आहे. त्यांना लोकांनी त्यांचं स्थान दाखवलं. बारामतीत भाजपचे अनेक स्टार प्रवक्ते आले, मात्र लोकांनी त्यांना जागा दाखवली, असे पवार म्हणाले. या निवडणुकीच्या प्लॅनिंगमध्ये काही चूक झाली नाही. आमच्या लोकांनी खूप चांगले प्रयत्न केले. आमच्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन काम केलं आहे. उद्याच्या निवडणुकांच्या दृष्टीने हे चित्र सकारात्मक आहे, असेही पवार म्हणाले.
संबंधित बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Rajya Sabha Election 2026: राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Embed widget