एक्स्प्लोर

Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत

Sanjay Raut in Mumbai: संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका.

मुंबई: एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडे गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवला, असे म्हणतात. पण एकनाथ शिंदे हे स्वत: पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या पायाशी गहाण आहेत. जो माणूस स्वत: मोदी-शाहांच्या पायाशी गहाण आहे, त्याने धनुष्यबाणाच्या गप्पा मारु नयेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मिळालेला धनुष्यबाण हा मोदींच्या कृपेने मिळाला आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊतांनी छगन भुजबळ यांनी दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा उल्लेख केला. अजित पवार गट आणि शिंदे गटाचे नेते ईडीपासून बचाव करण्यासाठी, आपली कातडी वाचवण्यासाठी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले. तसं नसतं तर भाजपमध्ये जातात प्रफुल पटेलांची ईस्टेट मोकळी झाली नसती. सध्या या सगळ्या नेत्यांच्या ईडी आणि सीबीआय फाईल्स कपाटात बंद करुन ठेवण्यात आल्या आहेत. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रताप सरनाईक हे नेते या भीतीमुळेच भाजपसोबत गेले. आता महायुतीचे सरकार जाणार असल्याने या नेत्यांना भीती नाही. या सगळ्या नेत्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये हवं ते साध्य केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

आता या सगळ्या नेत्यांविरोधातील ईडीची कारवाई थांबली आहे. किरीट सोमय्या या नेत्यांविरोधात काहीही बोलत नाहीत. ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या प्रत्येक नेत्याला मोकळा श्वास घ्यायचा होता. म्हणून त्यांनी आपापल्या नेत्याच्या पोटात खंजीर खुपसला. माझ्यावरही दबाव होता. पण आम्ही मरण पत्कारु, पण शरण जाणार नाही, हे मी तेव्हाच स्पष्टपणे सांगितले. भाजपवाले खंजीर आणून देतात आणि तो कुठे मारायचा सांगतात. काही नेत्यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असतं. एरवी हे नेते डरकाळ्या फोडतात. पण आम्ही नंतर पाहिलं की या नेत्यांचं काळीज उंदरांचं होतं, असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

संजय राऊतांची योगी आदित्यनाथांवर टीका

यावेळी संजय राऊतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर टीका केली. मुंबईत 'बटेंगे तो कटेंगे'चे पोस्टर्स लागले होते. योगी आदित्यनाथ यांचे चार भाऊ आहेत. पण गेल्या 40 वर्षांमध्ये हे चार भाऊ एकत्र आले नाहीत. अनेक वर्षे योगी आदित्यनाथ आपल्या आईला भेटले नाहीत. ते वडिलांच्या अंत्ययात्रेला गेले नाहीत आणि योगी आम्हाला हिंदुत्त्व शिकवतात. भाजपने कायम 'बाटेंगे'चे राजकारण केले, आम्ही राष्ट्र आणि समाजा एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता; छगन भुजबळांच्या दाव्याने नवे वादळ

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget