एक्स्प्लोर

गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी

15 तारखेला निवडणुका, 16 तारखेला मतदान आणि 17-18 तारखेला कुठेतरी ते दावोसला जाणार आहेत, म्हणजे मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का काय आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही, असे राज म्हणाले. 

Raj Thackeray:मुंबईत मराठी टक्का फक्त 27 टक्के उरला आहे, असे जे आकडे सांगितले जातात, ते मराठी माणसालाखच्चीकरण करण्यासाठी सांगितले जातात. मुंबईत मराठी टक्का 40 ते 41 टक्के असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज यांनी माझा कट्टावर बोलताना मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का कमी सांगून मराठी माणसाचे खच्चीकरण केलं जातं असल्याचे सांगितले. राज यांनी नमूद केलं की,  साधारणपणे मुंबई मधला गुजराती मारवाडी टक्का 13 टक्के आहे आणि युपी बिहार हा सगळा जर पट्टा पकडला तर तो साधारणपणे 15 टक्के आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, मराठी माणसाला निश्चित समजलेलं आहे की कोणाच्या बाजूने उभं राहायचं. तुम्ही जागे रहा आणि काय प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय त्याच्या विरोधात तुम्ही जोरदार मतदानाला उतरा, समोरच्यांनी आखलेले जे काही मनसुबे आहेत ते उध्वस्त करा, असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी मतदारांचा टक्का हा ४० ते ४१ टक्के असल्याचे सांगून कमी आकडेवारी सांगणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का? 

राज यांनी सांगितले की, पहिली गोष्ट म्हणजे वेळ फार कमी मिळाला या निवडणुकीला. अचानक मुख्यमंत्र्यांचा दावोसचा दौरा ठरला आणि लगेच 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या. हा कॉन्फिडन्स येतो कुठून की 15 तारखेला निवडणुका, 16 तारखेला मतदान आणि 17-18 तारखेला कुठेतरी ते दावोसला जाणार आहेत, म्हणजे मॅच फिक्स करून निवडणुका आहेत का काय आहेत हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही, असे राज म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांचा फायदा आणि विरोधकांची कोंडी

राज यांनी सांगितले की, विरोधी पक्षाला वेळच द्यायचा नाही. तुम्हाला तारखा माहिती असतात त्यामुळे तुम्ही अगोदर या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. त्यामुळे या योग्य निवडणुका होतात हे मला दिसत नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले की, 31 डिसेंबरच्या काळात लोक बाहेर असतात आणि अशा काळात अचानक निवडणुका लावणे हे अनाकलनीय आहे. निवडणूक आयोगाची मतदारांची यादी जी आहे फायनल यादी ती काल आली असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत जागा कोणत्या आरक्षित होत आहेत आणि तिथे कोणता उमेदवार टाकायचा ही प्रक्रिया सोपी नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मी बाकीच्या महानगरपालिकांची दिलगिरीच व्यक्त करतो की त्या सगळ्या ठिकाणी आम्ही मी तरी आम्ही तरी पोहचू शकलो नाही.

चार प्रभाग पद्धत आणि गोंधळ

राज ठाकरे म्हणाले की, सध्याच्या निवडणुकीतील प्रभागांची रचना अत्यंत गोंधळात टाकणारी आहे. मुंबई, ठाणे या ठिकाणी आमचं व्यवस्थित झालं, पण आरक्षण आणि हे चार प्रभाग या गोष्टींबद्दल मी इतका गोंधळात आहे की, सत्तेत असलेले लोक विरोधकांना कायम 'बेसावध' ठेवण्यासाठी अशा गोष्टी आगाऊ करून ठेवतात. विशेषतः चारच्या प्रभागांवर टीका करताना ते म्हणाले की, हे फॅड काँग्रेसच्या काळात आलं. मतदारांनी तिथे जाऊन चार-चार बटनं का दाबायची? भारतामध्ये अशा प्रकारची सिस्टीम कुठेही नाही, ती फक्त महाराष्ट्रात राबवली जाते. ते म्हणाले की, चारचे प्रभाग केल्यामुळे वेगवेगळी माणसं निवडून येतात आणि मग कोणीच काम करू शकत नाही. एखादा काम करायला गेला की दुसरा अडकाठी करतो. या मुद्द्यावर कायदेशीर लढा देण्याचा प्रयत्न केला असता, यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवतात. आम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात गेलो, तर ते म्हणतात हे निवडणूक आयोगाकडे येतं आणि निवडणूक आयोग म्हणतं हा राज्य सरकारचा निर्णय आहे. ही नुसती चालढकल आहे. 

अडीच-अडीच हजार मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरली

राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या एका विधानाचा दाखला देत निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, अजित पवार स्वतः म्हणाले की, आमच्या लोकांना सांगितलं गेलं की भाजपमध्ये या, अडीच-अडीच हजार मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरलेली आहेत. हे विधान पिंपरी-चिंचवड संदर्भात असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर असं म्हणत असतील की मशीनमध्ये मतं भरलेली आहेत, तर ही फेअर इलेक्शन नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget