एक्स्प्लोर

Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण

Raj Thackeray on BMC Election 2026: प्रचार फक्त बाहेरुन दिसतो, आतून बऱ्याच गोष्टी सुरु असतात. आत बरीच कामं सुरु असतात. मुंबईत हवी ती वातावरणनिर्मिती झाली आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Raj Thackeray on BMC Election 2026: राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत कमी वेळात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लावल्या. त्यामुळे विरोधी पक्षांना प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या तारखा माहिती असतात, त्यामुळे त्यांची तयारी झालेली असते. पण विरोधी पक्षांना तारखा माहिती नसल्याने फक्त आठ दिवसांत 29 महानगरपालिकांमध्ये (Mahangarpalika Election 2026) प्रचार करणे शक्य नाही. अशाप्रकारे निवडणुका घेणे योग्य नाही, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी एबीपीच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही ठाकरे बंधूंच्या सभा का झालेल्या नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांची त्यांची बाजू मांडली. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)

आमचं काम खूप आधीपासून सुरुच आहे. तुम्हाला बाहेरुन वाटतो तेवढाच प्रचार नसतो, आतून  बऱ्याच गोष्टी आणि कामं सुरु असतात. अनेक लोक मतदारसंघात आधीपासून काम करत असतात. माझ्या मते निवडणुकीची वातावरणनिर्मिती झाली आहे. मला 29 महानगरपालिकांचं माहिती नाही. पण मुंबई आणि ठाण्यात आमची तयारी झाली असून योग्य पद्धतीने गोष्टी सुरु आहेत. मी इतर महानगरपालिकांची दिलगिरीच व्यक्त करतो. त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो नाही.

पूर्वीच्या आणि आताच्या निवडणुकांमध्ये फरक आहे. पूर्वी सोशल मिडिया नव्हता. त्यावेळी लोक रस्त्यावर उतरुन राग व्यक्त करायचे. आता लोक मोबाईलवर राग व्यक्त करतात. त्यामुळे लोकांच्या मनात राग आहे, जे चाललंय त्याबद्दल चीड आहे, ती 15 तारखेला मतदानाच्या दिवशी निश्चित दिसेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. 

साधारण 31 डिसेंबरला लोक सुट्ट्यांसाठी बाहेर जातात, ते 4-5 तारखेला परत येतात. मग 5 जानेवारी ते 13 जानेवारी असे फक्त आठच दिवस प्रचाराला मिळतात. मग इतक्या कमी काळात प्रचार कसा शक्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा असल्याने 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या, अशी चर्चा आहे. 15 तारखेला मतदान, 16 तारखेला निकाल आणि मुख्यमंत्री 17-18 तारखेला दावोसला जाणार. याचा अर्थ या निवडणुका मॅचफिक्स करुन घेतलेल्या आहेत का? इतका आत्मविश्वास येतो कुठून, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Mumbai Election 2026: निवडणुकांचा असा पॅटर्न मी कधी पाहिलाच नाही: राज ठाकरे

महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण उशीरा जाहीर झाले. त्यामुळे कोणत्या भागात कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा, हे विरोधी पक्षांना ठरवता आले नाही. निवडणूक आयोगाने अनेक दिवस मतदारसंघाच्या याद्याच दिल्या नाहीत. कधी निवडणुका डिसेंबरमध्ये होतील, कधी मार्चमध्ये होतील, अशी चर्चा होती. अशाप्रकारचं अनिश्चिततेचं वातावरण आणि निवडणुकीचा पॅटर्न यापूर्वी मी कधीच पाहिलेला नाही. पूर्वी ठरवलेल्या वेळी निवडणुका व्हायच्या. काय चाललंय तेच कळत नाही. काही महानगरपालिकांमध्ये चार प्रभाग करण्याची गरज काय होती? ज्यांच्या हातात सत्ता असते ते बऱ्याच आधीपासून या गोष्टी करतात. त्यामुळे सत्ता नसलेल्यांन बेसावध ठेवता येते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही; आता राज-उद्धव ठाकरे म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget