एक्स्प्लोर

मला वाटलं नव्हतं एवढा नाटकी आहे, मी जाणार नाही बोलला, दुसऱ्या दिवशी लाच घेऊन नाचायला गेला, उद्धव ठाकरेंचा संजय बांगरांवर हल्लाबोल 

आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray : आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली.  कितीही नाटकं केली पैसा ओतला तरी समोरचे विकणार नाहीत. गद्दार विकला जातो निष्ठावान विकला जात नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आमदार संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यावर टीका केली. यावेळी तुम्हाला गद्दारालाच पाडायचे आहे असंही ठाकरे म्हणाले. शिवसेना फुटली तेव्हा मी वर्षा निवासस्थान सोडलं, त्यावेळी हा गद्दार सांगत होता साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका  आणि दुसऱ्या दिवशी लाच घेऊन गेला तिकडे नाचायला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बांगर यांच्यावर टीका केली. बराच वेळ माझ्याकडे यायचा साहेब मला वाचवा, मला तेव्हा वाटलं नाही हा एवढा नाटकी आहे असेही ठाकरे म्हणाले.  

मी आज हिंगोलीत गुंडगिरीवर नांगर फिरवायला आलो आहे. नवीन पीक घेण्याआधी नांगरटी करावी लागते. गेल्या निवडणुकीत मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आपल्या विरोधात गद्दारच उभा आहे. सर्व गद्दारांना पाडा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. विषय गद्दाराचा नाही. 

सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो

सरकार बदलण्याचा निश्चयाने आम्ही मैदानात उतरलो आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कालच्या सभेत लोकांनी सांगितले 60 टक्के पैसे खातात, ज्यांच्यावर आपण नांगर फिरवायला आलोय त्यांची दाढी किती वाढली बघा. जास्त मस्ती दाखवू नको आमचं सरकार येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः च्या वडिलांच्या फोटोची यांना लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो लावला जातो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते असेही ते म्हणाले. 

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांमध्ये कोसळतो आणि कोणाला काही पडले नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार आल्यावर शिवाजी महाराजांचा मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. सध्या राज्यात महिलांवर अत्याचार होतायेत, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. जय श्रीराम प्रमाणे आज पासून जय शिवराय असं म्हणायचं असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या गीतातून शिवाजी महाराजांचं नाव वगळण्यास निवडणूक आयोगाने सांगितलं होतं असेही ते म्हणाले. मुंबई अदनीच्या घशात घातली उद्या अख्खा महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतील. सरकार आल्यावर अदाणीच्या घशातून काढून सर्वांसाठी स्वस्त घरे उपलब्ध करून देईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget