एक्स्प्लोर

कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?

हर्षवर्धन जाधव आणि खैरे यांच्या आरोप-प्रत्यारोप यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत चांगलीच चुरशीची बनली होती. यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव देखील झाला होता. आता कन्नड मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे नाही तर राज्याचे लक्ष लागलेलं असणार आहे.

मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवरचा मतदार संघ कन्नड विधानसभा मतदारसंघ. कन्नड मतदार संघ काळभुई, घाटमाथा आणि खानदेशपट्टा या तीन भूप्रदेश भागात मोडला जातो. गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघाचं आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत ते आधी मनसे नंतर शिवसेना मग एकला चलो रे करत स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करणारे हर्षवर्धन जाधव. कन्नड मतदारसंघ राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. इथले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिला राजीनामा दिला आणि चर्चेत आले. हा त्यांचा आमदारकीचा काही पहिला राजीनामा नव्हता यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळ्याा कारणासाठी तीन वेळा राजीनामा सुपूर्त केला होता.

कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
 
मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आमदारकीचा राजीनामा देणे असो वा राजीनामा स्वीकारावा म्हणून वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिध्द करणे यावरूनही हर्षवर्धन चर्चेत राहिले.
या मतदारसंघाची जातीय समीकरणे पाहायची झाली तर मराठा आणि ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहे .त्यापाठोपाठ बंजारा माळी, मुस्लिम आणि इतर जाती धर्माच्या लोकांचा देखील या मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे.
 
हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव आणि मातोश्री तेजस्विनी जाधव या दोघांनीही या मतदारसंघातून आमदारकी भूषवली आहे. मात्र हर्षवर्धन जाधव मनसेतून शिवसेनेत आणि आता स्वतःचा राजकीय पक्ष त्यांनी उभा केला आहे. त्यामुळे इथले राजकीय रंग बदलतात की पुन्हा एकदा कन्नडचे लोक आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
    कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
तब्बल 240 गावं या मतदारसंघात आहेत. रायभान जाधव यांची तीन टर्म, त्यानंतर तेजस्वीनी जाधव यांची टर्म, यांच्यामुळे जाधवांचा हा तसा परंपरागत मतदारसंघ. अपवादाने 1999 मध्ये काँग्रेसच्या नितीन पाटील आणि 2004 मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी आमदारकी भूषवली. पण सत्तेचा आणि जाधवांचा हा दुरावा 10 वर्षांनी संपवला तो मनसेच्या तिकीटावर उभ्या राहिलेल्या हर्षवर्धन जाधवांनी. जाधव 5 वर्ष मनसे तर सध्या शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले जरी असले तरी त्यांनी आता स्वतःचा शिवस्वराज बहुजन पक्ष स्थापन करून स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. यावेळेस हर्षवर्धन जाधव स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र यावेळेस ही निवडणूक त्यांना म्हणावी तशी सोपी जाणार नाही असेच चित्र दिसत आहे. यावेळी मतदारसंघातील लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
 
2 लाख 75  हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात 2009 आणि 2014 ची आकडेवारी पाहता, हर्षवर्धन जाधव यांना 2009  मध्ये 46,106  तर 2014 मध्ये  62,542 मतं पडली होती. तर राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत यांना 2009 साली 41,999 मतं पडली होती आणि 2014 साली 60, 981 इतकी मत पडली होती. त्यांना केवळ 1561 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता हेच उदयसिंह राजपूत शिवसेनेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. उदयसिंह राजपूत यांचा स्वतःचा काही ठराविक मतदार आहे, तो राजपूत ज्या पक्षात जातील तेवढी मदत त्यांना पडत असतात. शिवाय यावेळी त्यांच्या पाठीमागे शिवसेनेकडून तिकीट मिळालं तर शिवसेनेचेही ताकत असेल, त्यामुळेच या मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध हर्षवर्धन जाधव अशीच लढाई पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शिवसेनेकडून या मतदारसंघातून अनेक नेते इच्छुक आहेत ज्यामध्ये केतन काजे ,मारोती राठोड यांची नावे देखील आघाडीवर आहेत. शेवटी शिवसेनेने कुणाला तिकीट देते यावरून या मतदारसंघाचे सेनेचे भवितव्य अवलंबून असेल. शिवाय खासदार खैरे हे देखील या मतदारसंघात प्रचारासाठी उतरतील. कारण केवळ हर्षवर्धन जाधव हे लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहिले त्यामुळे खैरे यांचा पराभव झाला याची सल खैरे यांच्या मनात आहेच.
 कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतो. गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसला हा मतदारसंघ काही परत मिळवता आला नाही. असं असलं तरी काँग्रेस कडूनही अनेक जण हा मतदारसंघ लढू इच्छितात. ज्यामध्ये नामदेव पवार, नितीन पाटील, संतोष कोल्हे यासह अन्य नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.
 
या मतदारसंघातून वंचितला देखील चांगली मते मिळाली आहेत. त्याबरोबरच गेल्या काही दिवसापूर्वी बंजारा समाजाच्या काही संघटनांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुस्लिम बंजारा समाजाच्या मतांची मोट बांधून वंचित एमआयएम देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवेल. पण त्यांना इथे यश मिळवणं सध्याची मतांचे समीकरणे पाहता जरा अवघड दिसत आहे.
 
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणाला पसंती दिली होती?
 
 चंद्रकांत खैरे यांना सर्वाधिक 73 हजार 988 मते मिळाली होती .
 
अपक्ष म्हणून उभा असलेले हर्षवर्धन जाधव यांना 69 हजार 374 मते मिळाली
 
एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 34 हजार 263 मतं
 
काँग्रेसचे सुभाष झांबड यांना 11 हजार 185 मते मिळाली होती.
 
मतदारांच्या बाबतीतही 'कही खुशी कही गम' असेच चित्र आहे. जाधव घराण्याला पारंपरिक मतांचा फार मोठा आधार आहे. पण काही नागरिक मात्र जाधव विकासकामांत अपयशी ठरल्याचा आरोप करताय. आमदारांनी काम केले आणि काम नाही केले असे दोन्ही बाजूने बोलणारे लोक या मतदार संघात आहेत. एकूणच मतदारसंघाचा विचार करता काही महत्वाच्या समस्या या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहे.
 
गौताळा सारखे अभयारण्य, दोन किल्ले असूनही मोठं पर्यटन केंद्र होऊ शकले नाही. शहराअतर्गत आणि ग्रामिण भागात रस्त्यांचे जाळे फारच तोकडे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, शिवना टाकळी प्रकल्प जवळ असूनही ते पाणी कन्नडपर्यंत पोहोचू शकले नाही.
 
2014 मध्ये उमेदवारांना मिळालेली मते
 
हर्षवर्धन जाधव (शिवसेना) 62543
 
उदयसिंग राजपूत (राष्ट्रवादी) 60981
 
डॉ. संजय गव्हाणे (भाजप) 28037
 
नामदेवराव पवार (काँग्रेस) 21865
 
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा होता. त्यामुळे अपक्ष उभा राहून देखील त्यांना अडीच लाखापेक्षा अधिक मते मिळाली होती.
 
विधानसभा निवडणुकीमध्ये  मराठा समाज हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीमागे उभा राहतो का?
 
वंचित मध्ये जाणार असल्याची मध्यंतरी चर्चा सुरू होती त्याचा फटका देखील त्यांना बसतो का?
 
याशिवाय वडिलांपासून या मतदारसंघांमध्ये जो मतदार जाधव कुटुंबीयांच्या मागे उभा असतो तो मतदार या निवडणुकीमध्ये उभा राहणार का?
 
यासोबतच उदय सिंग राजपूत यांचा स्वतःचा मतदार आणि शिवसेनेचे पाठबळ किती मिळतं? त्यांना तिकीट मिळतं का नाही?
 
या सगळ्यावर या मतदार संघाचे भवितव्य अवलंबून असेल. हर्षवर्धन जाधव आणि खैरे यांच्या आरोप-प्रत्यारोप यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील लढत चांगलीच चुरशीची बनली होती. यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव देखील झाला होता. आता या मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे नाही तर राज्याचे लक्ष लागलेलं असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक निश्चितच चुरशीची होईल यात काही शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
Embed widget