एक्स्प्लोर

बदल घडविणाऱ्या हिंगणघाट मतदारसंघात कोणाच पारडं जड?

काही निवडक म्हणजे जेमतेम दोन आमदारांचा अपवाद सोडला तर हिंगणघाटचे मतदार कधीही आमदार रीपीट करत नाहीत,अशी ख्याती आहे. हिंगणघाटची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघाने शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेल्या शरद जोशींनाही इथून पराभव स्वीकारावा लागलाय. 2014 च्या निवडणुकीत भाजप आमदाराने अन्य उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच वेळा काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे तर तीन वेळा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 1985 नंतर इथे कधीही काँग्रेसला यश मिळालं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागील निवडणुकीत इथे भाजपचं कमळ फुललं. हा मतदारसंघ सातत्यान बदल घडवणारा अशी ओळख आहे. दोन आमदारांचा अपवाद सोडला तर हिंगणाघाटच्या मतदारांनी कधीही आपल्या आमदाराला दुसऱ्यांदा निवडून दिलं नाही.

शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखल्या जाणारे, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनाही पराभव दाखवणारा हा मतदारसंघ. शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपाचं कोड सुटलं की आघाडीचेही उमेदवार स्पष्ट होताच निवडणुकीला रंगत येईल. यावेळी इथे भाजपचं कमळ पुन्हा खुलणार की राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे.
बदल घडविणाऱ्या हिंगणघाट मतदारसंघात कोणाच पारडं जड?
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) ही महत्त्वाची शहरे आहेत. यातील हिंगणघाट ही मोठी बाजारपेठ आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती समजली जाते. वार्षिक कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीवर सहकार गट म्हणजेच आताच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. पण नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे बहुतेक सर्कल भाजपच्या ताब्यात आहेत. कधी काळी हा भाग शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला. शेतकरी संघटनेचे मोठे नेते येथून उदयास आले. पण, वसंतराव बोंडे वगळता शेतकरी संघटनेच्या कोणालाही या मतदारसंघात फारसं राजकीय यश मिळालं नाही. शेतकरी नेते वसंतराव बोंडे दोनवेळा, शिवसेनेचे अशोक शिंदे हे तीनवेळा येथून आमदार राहिले आहेत. इतरांना मात्र अशी संधी मिळाली नाही.
या मतदारसंघाच्या भूतकाळात डोकावल्यावर काय दिसतं. 1962 मध्ये विनायक चौधरी हे अपक्ष आमदार निवडून आले. 1967 ते 1985 पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिलेत. यात 1985 मध्ये वसंतराव बोंडे हे शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर या मतदारसंघात मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला कायम हाताची मूठ बांधून घेतली. शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने वसंतराव बोंडे जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले. 1995 मध्ये शिवसेनेकडून अशोक शिंदे यांनी भगवा फडकवला. यावेळी त्यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांचा पराभव केला होता. 1999 मध्ये पुन्हा अशोक शिंदे विजयी झाले. यावेळी अशोक शिंदे यांना शिवसेना-भाजप सरकारमध्ये उद्योग राज्यमंत्रीपद मिळालं होतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू तिमांडे विजयी झाले. 2009 मध्ये अशोक शिंदे यांनी पुन्हा बाजी मारली. यावेळी अपक्ष म्हणून समीर कुणावार दुसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपकडून रिंगणात उतरताना समीर कुणावार यांनी तब्बल 65 हजार अशा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून कमळ खुलवलं. त्यांनी पाच वर्षाच्या सत्ताकाळात मतदारसंघात विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक कामे, अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. हिंगणघाटचा पुन्हा संधी न देण्याचा इतिहास पाहता ही निवडणूक कुणालाही सोपी जाणारी नाही.
हिंगणगाटच्या जागेसाठी शिवसेना करू शकते दावा
शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे हे सर्वाधिक तीन वेळा येथून आमदार राहिले आहेत. त्यामुळे इथे तिकीटाकरिता शिवसेना दावेदारी करू शकते. भाजपला जागा सोडायची नसल्यास शिवसेनेला देवळी मतदारसंघाचा पर्याय दिला जाऊ शकतो असाही सूर ऐकायला मिळत आहे.
अंतर्गत गटबाजी
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षात येथे अंतर्गत गटबाजी आहे. हिंगणघाट पालिकेतील काही नगरसेवक, काही पदाधिकाऱ्यांत सुप्त नाराजीचे सूर ऐकायला मिळतात. युती झाली तरी ज्याचं तिकीट कटेल तो युतीच्या उमेदवाराचं काम करेल का, याविषयी कुणालाच खात्री देता येत नाही. बसपाची मतेही परिणाम करणारी असतील. मनसे जोरात नसली तरी राजकीय महत्वाकांक्षा ठेवून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार राजू तिमांडे यांच्या पुढे सहकार नेते, बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांचं आव्हान असणार आहे. अॅड कोठारी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरण्यासाठी तयारी करत आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क त्यांची दावेदारी प्रबळ करणारा ठरतो.
हिंगणघाटसाठी 2014 ची निवडणूक ही आगळी वेगळी होती. या निवडणुकीत भाजपने सर्वच उमेदवारांची अमानत रक्कम जप्त केली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अनुक्रमे तिसऱ्या चवथ्या क्रमांकावर ढकलत बहुजन समाजवादी पक्षाचे प्रलय तेलंग हे दुसऱ्या क्रमांकावर आले. या निवडणुकीनंतर प्रलय तेलंग यांचा नगर पालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने बहुजन समाज पक्षाकडून त्यांचे नाव मागे पडले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अनिल जवादे यांची उमेदवारी ही अनेक छोट्या मोठ्या पक्षांच्या पाठिंब्याने केली जाऊ शकते. अनिल जवादे हे देखील मोठं आव्हान उभे करू शकतात.
लोकसभेत भाजप उमेदवाराला सर्वाधिक आघाडी
लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगणघाट मतदारसंघातून सर्वाधिक 38 हजार 278 एवढं मताधिक्य मिळालं होतं. लोकसभेत भाजपचे रामदास तडस यांना 103610 तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना 65332 मते मिळाली.
मागील निवडणुकीत मिळालेली मतं
समीर कुणावार (भाजप) 90275 प्रलय तेलंग (बसपा) 25100 राजू तिमांडे (राष्ट्रवादी काँग्रेस) 23083
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Rajya Sabha Election 2026: राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
Embed widget