एक्स्प्लोर

भाजपमध्ये येणारे सगळे साधुसंत नाहीत, हे खरं : आशिष शेलार

राजकारणामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टी कराव्या लागतात. ज्यांना भाजपमध्ये घेतलं त्यांना आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अविश्वास म्हणून नाही घेतलं. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून केवळ योग्य व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई : भाजपात येणारे सगळे साधुसंत नाहीत, हे एकनाथ खडसे यांचं विधान खरं असल्याचं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिलं आहे. भाजपमध्ये येणारे अनेकजण पक्षाच्या नियमात बसणारे नाहीत, असेही शेलार म्हणाले. एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, आम्ही भाजपमध्ये इनकमिंग करताना सरसकट दरवाजे उघडलेले नाहीत, त्यासाठी फिल्टर सुरु आहे. भाजपमध्ये संधी ही प्रामाणिक कार्यकर्त्यालाच मिळाली आहे आणि इथून पुढेही मिळेल, असेही शेलार म्हणाले. आमच्या पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी मिळते. मी स्वतः सामान्य परिवारातून आहे. निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही यासाठी पक्ष काळजी घेतो. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष योग्यच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. राजकारणामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टी कराव्या लागतात. ज्यांना भाजपमध्ये घेतलं त्यांना आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अविश्वास म्हणून नाही घेतलं. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून केवळ योग्य व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे, असेही ते म्हणाले. यावेळी युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, युती होणार आहे, युतीचे चित्र स्पष्ट आहे, फक्त चित्रामध्ये रंग भरणे सुरु असल्याचे सांगत भाजप 160 जागा लढणार असल्याचेही ते म्हणाले.  शिवसेनेबाबत बोलताना त्या वेळच्या परिस्थितीनुसार टीका केली होती, असे शेलार म्हणाले. यावेळी शेलार यांनी शिवसेनेबाबत बोलणं टाळलं असलं तरी आदित्य ठाकरे यांची स्तुती केली. आदित्य ठाकरे यांची तळमळ खूप चांगली आहे. ज्या पद्धतीने ते काम करत आहेत ते चांगलं आहे, असेही ते म्हणाले. शेलार म्हणाले की, निवडणूक ह्या राज्यातील मुद्यावरच लढल्या जातील. काश्मीर मुद्दा हा आमचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. देशातील विविध शहरात जाऊन गृहमंत्री अमित शाह हे या संदर्भात व्याख्यान देत आहेत. तसाच कार्यक्रम मुंबईत देखील आयोजित केला होता, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांना नक्कीच न्याय मिळेल असंही सांगितलं.
एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gujarat Local Body Election Results 2026: क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
West Bengal Election 2026: मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्निंग, महुआ मोईत्रांनी एका वाक्यात 'हिरोगिरी'...
मतदानापूर्वी युपीचा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पश्चिम बंगालमध्ये, ममता बॅनर्जींच्या खास माणसाला वॉर्निंग, महुआ मोईत्रांनी एका वाक्यात 'हिरोगिरी'...
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Embed widget