एक्स्प्लोर

Bacchu Kadu : गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन मात्र..., बच्चू कडूंचा 'प्रहार'

Bacchu Kadu : माझा पराभव हा तांत्रिक आहे. ईव्हीएम मशीनचा ही त्यात सहभाग आहे. माझी ही गफलत झाली. अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांनी ही आपल्या पराभवाचे कारण सांगत ईव्हीएम मशीनला जबाबदार ठरवलंय.    

Bacchu Kadu अमरावती :देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेसाठी फोन केला होता. मात्र माझ्या मतदारसंघासाठी काही मदत हवी आहे का? काही निधी हवा आहे का? यासाठी कधीही त्यांनी फोन केला नाही. किंबहुना मित्रता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मला फोन केला नाही. त्यामुळे गरज सरो आणि वैद मरो! ही भाजपची नेहमीची भूमिका असल्याची टीका करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

जाती-धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा परिणाम झाला. त्यामुळे माझा पराभव हा तांत्रिक पराभव आहे. ईव्हीएम मशीनचा ही त्यात सहभाग आहे. माझी ही गफलत झाली. मात्र मी पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता  वाढेल. मला पराभूत झाल्यावर ही आनंद आहे कारण मी दिव्यांगांसाठी काम करतोय. अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ही आपल्या पराभवाचे कारण सांगत ईव्हीएम मशीनला जबाबदार ठरवले आहे.    

भाजप म्हणजे 'गरज सरो वैद्य मरो'

राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत. त्यात दिव्यांग, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात पैसा आणि जात माझ्या विजयाच्या वाटेत आली. विरोधकांनी बच्चू कडूला टार्गेट करून अभियान राबवविलं.  तसेच भारतीय जनता पार्टी म्हणजे "गरज सरो वैद्य मरो" मलाही याचा अनुभव आलेला आहे. त्यांच्या मदतीसाठी फडणवीस यांचा फोन येतो, मात्र त्यानंतर ते बच्चू कडूंना विसरले.

मोहन भागवत यांनी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे

दरम्यान, घटत्या लोकसंख्या वाढीच्या दरावरुन सरसंघचालकांनी मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी म्हटलं आहे. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांनी यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावरून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संघ प्रमुख मोहन भागवत यांनी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे, असा सल्ला दिला आहे. भाजपच्या आमदार खासदारांनी आधी हे केलं पाहिजे. एकीकडे तीन अपत्य असेल तर निवडणूक लढवता येत नाही. महत्त्वाचं राष्ट्रहित आहे. राष्ट्र आहे तर धर्म आहे. असेही बच्चू कडू म्हणाले.

सत्तेतला दांडुक म्हणजे हे मंत्रालय- बच्चू कडू 

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेबाबतही  बच्चू कडू यांनी भाष्य केलंय.  गृह मंत्रालय या साठी महत्त्वाचं आहे की कुणाला ठेचायच, कुणाच्या नाग्या नडवायच्या ते या गृह मंत्रालयकडून केल्या जातात. सत्तेतला दांडुक म्हणजे हे मंत्रालय. गावात कितीही खून होऊ द्या, त्याच्याशी पार्टीला काही घेणे देणे नसतं. असंख्य खूनातून पार्टी कशी निर्माण करता येईल, हा भाव त्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून असतो. असेही बच्चू कडू म्हणाले.

एकनाथ शिंदे माझे मित्र, मात्र...  

लाडकी बहीण योजना आणून वेळेवर तिजोरी खाली केली आणि नंतर फोन केल्या गेले की तुमच्या खात्यात सात हजार रुपये आले, हे काय? त्यामुळे जिसकी सत्त्ता उसकी भैंस. असेही बच्चू कडू म्हणाले. तर मुख्यमंत्री कुणीही होवो, जो जनतेची काम करेल तो आवडेल. असेही ते म्हणाले. माध्यमांनी खोटी माहिती जाहीर केली की मी शिंदेंना भेटलो. मात्र माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही. ते माझे मित्र जरूर आहेत. मात्र आमची भेट झालेली नाही. 

ही बातमी वाचा: 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune: डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
Samruddhi Expressway :  समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Gold Rate Update: सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! पोलिसांविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या  दंडकारण्य ऑपरेशनची सूत्रे बदलली, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! नक्षलवाद्यांचं नेतृत्व बदललं, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune: डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
Samruddhi Expressway :  समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Gold Rate Update: सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! पोलिसांविरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या  दंडकारण्य ऑपरेशनची सूत्रे बदलली, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
नक्षल चळवळीतील मोठा बदल! नक्षलवाद्यांचं नेतृत्व बदललं, कोण आहेत देवजी सरचिटणीस, हिडमा?
Solapur Crime: जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळा आढळला नाही, तर कोणाला अन्न द्यावे? शास्त्र काय म्हणते? श्राद्ध कर्माशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या...
पितृपक्षात कावळा आढळला नाही, तर कोणाला अन्न द्यावे? शास्त्र काय म्हणते? श्राद्ध कर्माशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या...
Rohit Pawar & Ajit Pawar: अंजना कृष्णा प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल; रोहित पवार दादांच्या मदतीला धावले
अंजना कृष्णा प्रकरणावर दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल; रोहित पवार दादांच्या मदतीला धावले
Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
Embed widget