एक्स्प्लोर

Pandharpur : हिंदूंनी तीन मुलांना जन्म द्यावा, मोहन भागवतांचं वक्तव्य; पंढरपुरात आलेले विठ्ठल भक्त म्हणतात, एकीकडे महागाई वाढताना....

RSS Mohan Bhagwat : हिंदूंचा जन्मदर घटला असून त्यांनी तीन मुलांना जन्म द्यावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंच्या घटत्या जन्मदराबाबत केलेल्या वक्तव्यावर पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका बाजूला महागाई वाढत असताना एक किंवा दोन मुलांना सांभाळणेच अवघड होत चालल्याचं विठ्ठल भक्त म्हणाले. अशा परिस्थितीत मुलांची संख्या वाढल्यास त्यांच्यासाठी होणारा खर्च कसा करायचा असा प्रश्नही त्यांनी विचारला.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ग्रामीण भागात आता हिंदूंचाच नाही तर मुस्लिमांचाही जन्मदर वाढत्या महागाईमुळे घटत चालला असून भागवत यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचा दावा काही जणांनी केला. महिला भाविकांच्या मते, आपली परिस्थिती बघून मुलांची संख्या वाढली तरी हरकत नाही. मात्र या मुलांना व्यवस्थित वेळ देणे आणि त्यांचे करिअर घडवणे अवघड असल्याने या पिढीतल्या महिलांना दोनच मुले योग्य वाटतात.

दुसऱ्या बाजूला हिंदूंनी ही मुलांची संख्या वाढवणे गरजेचे असून ही सांगायची वेळ आज आलेली आहे हे दुर्दैव असल्याचे एका महिला भाविकांनी सांगितले. खरे तर ज्या पद्धतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालल्याने मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि यातूनच उद्या अनेक धोके समोर येऊ शकतात अशी भीती त्या महिला भाविकांनी व्यक्त केली. 

तरुणांत मात्र भागवतांच्या वक्तव्यावर सकारात्मक भावना दिसून आली. या महागाईत जर त्यांना मुलांची संख्या वाढवून जगणे शक्य होत असेल तर हिंदूंनी मुलांना जन्माला का घालू नये असा सवाल तरुण भाविक करीत आहेत. तर अशाच रीतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालला तर 2047 मध्ये भारतात आपण अल्पसंख्यांक बनवून अशी भीती तुळजापूरच्या एका तरुण भाविकाने व्यक्त केली. 

मोहन भागवतांच्या भूमिकेला महागाईचा अडसर सर्वसामान्यतून दिसत असला तरी तरुणांना मात्र त्यांची भूमिका योग्य असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले मोहन भागवत?

लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको, अशी चिंता सरसंघाचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली. प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी सांगितलं. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांनी यासंदर्भात भाष्य केलं. तर लोकसंख्यावाढीचा दर 2.1 पेक्षा खाली जाणारा असल्यास समाज नष्ट होतो असं भागवतांनी सांगितलं. दरम्यान यावरून असदुद्दीन ओवैसींनी खोचक निशाणा साधला. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Mahanagarpalika Eknath Shinde Shivsena: तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला शह!
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
सुप्रीम कोर्टात उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाकारला, JNU मध्ये मोदी शाहांविरुद्ध नारेबाजी, एफआयआर दाखल; विद्यार्थ्यांची ओळख पटली
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
म्हणून प्रियकराला उशीने गळा दाबायला सांगून मी नवऱ्याचं गुप्तांग दाबलं; बायकोनं सांगितली नवऱ्याला संपवलेली थरारक कहाणी
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Embed widget