एक्स्प्लोर

Pandharpur : हिंदूंनी तीन मुलांना जन्म द्यावा, मोहन भागवतांचं वक्तव्य; पंढरपुरात आलेले विठ्ठल भक्त म्हणतात, एकीकडे महागाई वाढताना....

RSS Mohan Bhagwat : हिंदूंचा जन्मदर घटला असून त्यांनी तीन मुलांना जन्म द्यावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंच्या घटत्या जन्मदराबाबत केलेल्या वक्तव्यावर पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका बाजूला महागाई वाढत असताना एक किंवा दोन मुलांना सांभाळणेच अवघड होत चालल्याचं विठ्ठल भक्त म्हणाले. अशा परिस्थितीत मुलांची संख्या वाढल्यास त्यांच्यासाठी होणारा खर्च कसा करायचा असा प्रश्नही त्यांनी विचारला.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ग्रामीण भागात आता हिंदूंचाच नाही तर मुस्लिमांचाही जन्मदर वाढत्या महागाईमुळे घटत चालला असून भागवत यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचा दावा काही जणांनी केला. महिला भाविकांच्या मते, आपली परिस्थिती बघून मुलांची संख्या वाढली तरी हरकत नाही. मात्र या मुलांना व्यवस्थित वेळ देणे आणि त्यांचे करिअर घडवणे अवघड असल्याने या पिढीतल्या महिलांना दोनच मुले योग्य वाटतात.

दुसऱ्या बाजूला हिंदूंनी ही मुलांची संख्या वाढवणे गरजेचे असून ही सांगायची वेळ आज आलेली आहे हे दुर्दैव असल्याचे एका महिला भाविकांनी सांगितले. खरे तर ज्या पद्धतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालल्याने मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि यातूनच उद्या अनेक धोके समोर येऊ शकतात अशी भीती त्या महिला भाविकांनी व्यक्त केली. 

तरुणांत मात्र भागवतांच्या वक्तव्यावर सकारात्मक भावना दिसून आली. या महागाईत जर त्यांना मुलांची संख्या वाढवून जगणे शक्य होत असेल तर हिंदूंनी मुलांना जन्माला का घालू नये असा सवाल तरुण भाविक करीत आहेत. तर अशाच रीतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालला तर 2047 मध्ये भारतात आपण अल्पसंख्यांक बनवून अशी भीती तुळजापूरच्या एका तरुण भाविकाने व्यक्त केली. 

मोहन भागवतांच्या भूमिकेला महागाईचा अडसर सर्वसामान्यतून दिसत असला तरी तरुणांना मात्र त्यांची भूमिका योग्य असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले मोहन भागवत?

लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको, अशी चिंता सरसंघाचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली. प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी सांगितलं. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांनी यासंदर्भात भाष्य केलं. तर लोकसंख्यावाढीचा दर 2.1 पेक्षा खाली जाणारा असल्यास समाज नष्ट होतो असं भागवतांनी सांगितलं. दरम्यान यावरून असदुद्दीन ओवैसींनी खोचक निशाणा साधला. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget