एक्स्प्लोर

शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचंच डोकं फुटेल : दिलीप लांडे

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत घरोबा करण्याचं पक्क केल्यानंतर भाजपने ऑपरेशन लोटस हाती घेतल्याचं बोललं जातं आहे. त्यासाठी आमदार फोडाफोडीची, घोडेबाजाराची चर्चा आहे.

मुंबई : शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा दिला आहे. "शिवसेनेचा आमदार फोडणं तसं शक्य नाही. पण जर कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल, असं वक्तव्य दिलीप लांडे यांनी केलं आहे. 'द रिट्रीट' हॉटेलमधून आपल्या मतदारसंघात परत जाताना दिलीप लांडे यांनी हे वक्तव्य केलं. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत घरोबा करण्याचं पक्क केल्यानंतर भाजपने ऑपरेशन लोटस हाती घेतल्याचं बोललं जातं आहे. कर्नाटकात राबवलेला पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा भाजपचा इरादा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी आमदार फोडाफोडीची, घोडेबाजाराची चर्चा आहे. शिवाय आमदार फुटीच्या भीतीने शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तर काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. अविश्वासामुळे हॉटेलमध्ये ठेवलं नाही! आमदार फोडण्याविषयी दिलीप लांडे म्हणाले की, "शिवसेनेचा आमदाराना फोडणं तसं शक्य नाही. पण जर कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल. परंतु त्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलं नव्हतं. राष्ट्रपती राजवट लागण्यापूर्वी कधीही सत्ता स्थापनेसाठी बोलावतील. त्यामुळे सर्व आमदार जवळ असणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्हीच सांगितलं, साहेब लांबून येणं अवघड आहे, आम्हाला इथेच ठेवा, म्हणून आम्हाला इथे जवळ ठेवलं. 7.30 वाजता पोहोचणं गरजेचं होतं. मग अशावेळी वेळेत राज्यपालांकडे पोहोचण्यासाठी आम्हाला जवळ ठेवलं होतं, अविश्वासामुळे नाही." आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश गेल्या अनेक दिवसांपासून मालाडच्या रिट्रीट हॉटेलात मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून आमदार परतायला सुरुवात झाली आहे. तरी, या आमदारांना 17 नोव्हेंबरला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीला त्यांच्या स्मृतिस्थळावर हजर राहण्यास सांगितलं आहे. याबद्दल दिलीप लांडे म्हणाले की, "नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा शिवसेनेवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी, त्याच्या अडचणीच्या वेळी प्रत्येक शिवसैनिकाने त्याच्या मदतीला जाण्याची गरज आहे. आम्ही आमदार खेडेगावातून आलो आहोत, आम्ही स्वत: शेतकरी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी,  सर्वांनी आपापल्या विभागात जाऊन, शेतकऱ्याला मदत करणं आणि सोबत राहणं गरजेचं असल्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला आहे." संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Embed widget